Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

राम मंदिरामुळे माझे पराभाव झाले मा.खासदार सदाशिव लोखंडे

शिर्डी प्रतिनिधी
अयोध्येत बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही, असे शिंदे गटाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी म्हटले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दरम्यान सदाशिव लोखंडे पुढे बोलताना म्हणाले की, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत, या सर्वांचा मला निवडणुकीत फटका बसला आणि मी पराभूत झालो असे सदाशिव लोखंडे यांनी कर्जतमध्ये माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

सदाशिव लोखंडे यांनी मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला असे म्हणत विखे पाटील आणि थोरातांच्या राजकीय वादातून आपला पराभव झाला

असे अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. तर माझ्या मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला, असे म्हटले आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे

कोपरगाव लोकसभा मतदारसंघाच्या विभाजनानंतर 2008 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. हा मतदारसंघाच्या निर्मितीपासून (2009 पासून) या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. पण शिवसेनेतील फुटीनंतर या मतदारसंघात यंदा ‘शिवसेना’ विरुद्ध ‘शिवसेना’ म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत झाली होती. 2014 मध्ये उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये परतले.

तर शिवसेना फुटीनंतर सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली होती. भाऊसाहेब वाकचौरे विरूध्द सदाशिव लोखंडे असा सामना या निवडणुकीत झाला आहे. शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मशाल पेटवली आहे. जनतेने भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची संधी दिली आहे.
या विषयी खुलासा करण्यासाठी आज शिर्डी येथे शिवालयात सायंकाळी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार् परिषदेचे आयोजन केले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button