Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
अ.नगरक्राईम

समता नागरी पतसंस्थेवर आर्थिक घोटाळ्याचे गंभीर आरोप-ठेवी सुरक्षित नसल्याच्या भीतीने सभासदांमध्ये घबराट-श्रीरामपूर शाखेत गर्दी

कोपरगाव | प्रतिनिधी :
कोपरगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील समता नागरी पतसंस्था सध्या गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, संस्थेवर थेट आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याचे आरोप झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. काही कर्जदारांनी उघडपणे केलेल्या आरोपांमुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ठेवीदारांमध्ये आपल्या आयुष्यभराच्या कष्टाचे पैसे सुरक्षित आहेत की नाही, याबाबत तीव्र संभ्रम आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

sai nirman
जाहिरात

या आरोपांचा थेट फटका श्रीरामपूर येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेला बसल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. पतसंस्थेबाबत सुरू असलेल्या नकारात्मक चर्चांमुळे आणि घोटाळ्याच्या गंभीर आरोपांमुळे घाबरलेल्या सभासदांनी मोठे पाऊल उचलत आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी शाखेकडे धाव घेतली. सकाळपासूनच शाखेसमोर सभासदांची अक्षरशः गर्दी उसळली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात लाखो रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या गेल्या, त्यामुळे पतसंस्थेची आर्थिक स्थिती आणि तरलतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. “आज पैसे नाही काढले, तर उद्या मिळतील की नाही?” या भीतीपोटी अनेक सभासदांनी दीर्घकाळासाठी ठेवलेली बचतही तातडीने काढून घेतल्याचे समजते.

DN SPORTS

काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील ही पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने, प्रशासन, सहकार विभाग आणि तपास यंत्रणा यांची पुढील भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपांची चौकशी होणार का? दोषींवर कारवाई होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहणार का? – हे प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

या प्रकरणाचे पुढील पडसाद सहकार क्षेत्रात मोठ्या हालचाली घडवू शकतात, अशी शक्यता व्यक्त होत असून, समता नागरी पतसंस्थेच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे सावट अधिक गडद होत चालले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button