Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अ.नगरशिर्डी

शिर्डी साई संस्थान नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या अधिवेशनात होणार मंत्री संजय शिरसाठ

महाराष्ट्र राज्याचे सामाजिकमंत्री यांनी शिर्डीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डीत एका खासगी कार्यक्रमात त्यांनी सहपरिवार हजेरी लावली होती त्यानंतर प्रसारमध्यमाशी बोलताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले, मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेतील आरोपी कृष्णा आंधळे हा तीन महिन्यांपासून फरार असून त्याचीही हत्या झाली आहे काय असा सवाल त्यांनी उपस्थित करत एखादा आरोपी इतक्या दिवस फरार होऊन अजूनही पोलिसांना मिळून येत नाही त्यामुळे ही शंका व भीती वाटतं असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे महायुतीत येणार यावर त्यांनी सांगितल की हे फार पूर्वीच होणार होत, कारण अजितदादा पवार, अशोक चव्हाण व इतर अनेकजण महायुतीत येणार हे भाकीत मी दोन वर्षांपूर्वीच सांगितलं होत त्यामुळे उशीरा का होईना जयंत पाटील महायुतीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तर शरद पावरांना धक्का देण्यासाठी हे होत नसून आता प्रत्येकाला महायुतीच्या कामावर विश्वास वाटत असून त्यामुळेच महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते मकहायुतीत येण्यासाठी इच्छुक आहेत.

उद्धव ठाकरे यांची कार्यकर्ते तसेच पक्षावरची पकड राहिली नसून कार्यकर्त्याशी संपर्क नसल्याने मोठी नाराजीची लाट उसळली असून आमचं मिशन टायगर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठं काम करत असून काही दिवसातच अनेक आमदार, खासदार, नगरसेवक हे शिंदे गटात सामील होणार आहेत त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे व महायुती किंवा शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करू नये असा खोचक टोलाही शिरसाठ यांनी लागवला.

तर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कायदेशीर बाबींचे पूर्ण पालन केले असून ज्यावेळी न्यायालय शिक्षा सुनावेल त्याचवेळी त्यांच्यावर करावाई होईल तोपर्यंत त्यांना कुठलीही काळजी करण्याची गरज नाही.
राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात प्रसिद्ध होणार असून या लाडकी बहीण योजनेचा फार मोठा फरक या अर्थशंकल्पवार पडणार असून त्यातील त्रुटी दुरुस्त करून निर्णय होणार असून लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही

याची मी खात्री देतो असा विश्वास संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला.
राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या शिर्डी साई संस्थान नवीन विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा निर्णय या अधिवेशनात होणार असून शिर्डीतील साई संस्थांनमध्ये चांगले, टिकाऊ विश्वस्त मंडळ लवकरच स्थापन होईल असंही संजय शिरसाठ यांनी सांगितलं.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button