Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला

राहाता :
संत आणि क्रांतिकारकांची परंपरा लाभलेल्या राहाता शहराला भूतकाळात ‘चळवळीत गाव’ म्हणून ओळख मिळाली. संत साईबाबा, उपासनी महाराज, संत लक्ष्मण महाराज वाकचौरे, संत सुमंत महाराज, तात्याभाऊ भगत यांची पवित्र भूमी…
पण आज चित्र पूर्ण उलटे झाले आहे.

sai nirman
जाहिरात

राहाता शहराला ज्या वैभवाची परंपरा लाभली होती, ते वैभव राजकीय घराणेशाही, परस्परांचे गट-तट, सत्तेची भूक आणि भ्रष्ट कारभारामुळे रोज ढासळत चालले आहे.


🔥 विकास शून्य – राजकीय संघर्ष मात्र कायम

DN SPORTS

ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून काही ठराविक घराणी सत्ता भोगत आली. परंतु, या दीर्घ सत्ताकाळात शहराचा विकास?—
शून्य.

नागरिकांच्या मूलभूत गरजांवर हीच स्थिती कायम:

आजही पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही

घराघरात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही

भुयारी गटार प्रकल्प अपूर्ण

kamlakar

डांबरी रस्ते आणि चौकांची कामे कागदावरच

पाणी साठवण तलाव नाही

रिंगरोड दशकांपासून केवळ आश्वासनात

पथदिवे, मॉडेलिंग सुविधा, ई-गव्हर्नन्स योजना—सर्व अपूर्ण

जेष्ठ नागरिक गार्डन, पर्यावरण योजना, जातीवार कल्याण योजना—फोल

धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास—शून्य प्रगती

शहराच्या वाढत्या लोकसंख्येला अनुरूप वैद्यकीय सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत.


🔥 नागरिकांचे आर्थिक शोषण — कर वाढ, दंड, ब्युरोक्रसीचा त्रास

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दिले काय?
तर—

२४% करवाढ

त्यावर २% व्याज

त्यावरही दंड!

नागरपरिषदेकडून लेखा परीक्षणात आलेले ताशेरे अजूनही दडवले जात आहेत.
शहर वारंवार खोदले जाते, निधी कुठे जातो याचे पारदर्शक उत्तर कोणी देत नाही.


🔥 निवडणूक आली की टोळी – आमिष – खोटे आश्वासन

निवडणूक तोंडावर आली की पकडलेल्या लोकांना हाताशी धरायचे, आमिष दाखवायचे, गट-तट create करून सत्ता मिळवायची—
हीच जुनाट पद्धत आता नागरिकांनी फाट्यावर मारली आहे, असे वातावरण शहरभर दिसते.


🔥 नागरिकांचा इशारा – “आता झाडू हातात!”

भ्रष्टाचार, अत्याचार आणि ढोंगी विकासाचा शेवट आता करायचा—
असा एल्गार राहाता शहरात उमटताना दिसत आहे.

“दारोदार मतांचा जोगवा मागायचा असेल तर आधी उत्तर द्या—

  • २४% करवाढ का केली?
  • पाणीपुरवठा का नाही?
  • रस्ते वारंवार का खोदले?
  • लेखा परीक्षणातील ताशेरे कोणासाठी?”

असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.


🔥 **राहात्यात आम आदमी पार्टीची जोरदार हाक—

भ्रष्टाचार झाडण्यासाठी ‘झाडू’ तयार!**
राहाता शहराचा विकास योग्य दिशेने नेण्यासाठी आणि भ्रष्टाचार झाडण्यासाठी आम आदमी पार्टीने जनतेसमोर स्पष्ट हाक दिली आहे.

दि. २ डिसेंबर २०२५ रोजी
“झाडू” चिन्हासमोरील बटन दाबा
आणि राहाता शहराच्या परिवर्तनाला सुरुवात करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपचे प्रमुख उमेदवार :

नगराध्यक्ष पद — विधीज्ञ रामनाथ भाऊसाहेब सदाफळ

प्रभाग ८ — डॉ. जयंत दामोधर गायकवाड

प्रभाग ५ — महेश अरविंद भालेराव

प्रभाग ३ — निता अमोल शहा

नागरिकांच्या पाठिंब्याने भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम राहाता उभारण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button