Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
शिर्डी

श्री साईबाबा संस्थानाचे १९२० कंत्राटी कर्मचारी होणार कायम कर्मचाऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण

शिर्डी, प्रतिनिधि
श्री साईबाबा संस्थानमध्ये गेल्या २२ ते २३ वर्षांपासून विविध विभागात काम करत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या संघर्षाला अखेर साईच्या दरबारात यश मिळाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

वास्तविक ५९८ कर्मचारी यांनी कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्यासाठी शासनाकडे, राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवली होती. तर दुसरीकडे न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केले होते.

kamlakar

९ मे रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश स्वाँद्र पुगे व आर. एम. जोशी यांनी या याचिकेवर निकाल दिला आहे. संस्थानमध्ये दहा वर्षांपासून हे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे असा आदेश देण्यात आला. आदेशाची अंमलबजावणी १२० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून या निकालामुळे १९०० कामगारांचे कल्याण होणार आहे. या निकालानंतर कामगार विभागातून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असुन हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


गेल्या २२ते २३ वर्षांपासून कायमस्वरूपीची ऑर्डर मिळावी, यासाठी अनेक कामगारांनी संघर्ष केला. अनेक आंदोलने झाली, दुर्दैवाने हे स्वप्न उराशी बाळगणारे काही कर्मचारी देवाघरी गेले. यात फक्क ५९८ कंत्राटी कामगारांना आशा होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळताना १९२० कर्मचान्यांचे कल्याण होणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यात यासर्व १९०० कर्मचायांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्याची शक्यता असून २०२४ है वर्ष कंत्राटी कामगारांसाठी एक भविष्याला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button