Letest News
गणेश गॅस एजन्सीचे संस्थापक बबनराव भुसारी पाटील यांची ज्ञानेश्वर कारखान्याच्या संचालकपदी निवड शिर्डीत भाविकांच्या जीवाशी खेळ-निकृष्ट पेढ्यांचा गोरखधंदा सुरूच-एफडीएचे मात्र 'हातावर हात'! साईनगरीत साखळीचोरांचा हैदोस-दर्शनासाठी आलेल्या वृद्ध भाविकेची ३ लाखांची लूट-चोराला नागरिकांनीच शिकवल... उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी - जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील लग्नाच्या आमिषाने तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश-राहाता पोलिसांची धडाकेबाज कारवाई शिवसेना वर्धापन दिन उत्साहात-शिर्डीत शिवसैनिकांचा जल्लोष साई समाधीवर फुलांची चादर अर्पण करत शिवसेनेच... साईनगरीत चोरट्यांचा धुमाकूळ!-साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक ७ समोरच साईभक्त महिलेचे 2 लाखांचे सोन्या... "गद्दार म्हणणाऱ्यांनी आधी आरशात पाहावं" शिर्डीतून नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात वेट एन जॉयचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! १७ लाखांचे सोने आठ दिवस दडवले-व्यवस्थापन झोपेत होते की मिलीभग... अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त 
अ.नगरराजकीय

विखे कुटुंबाचे राजकारण हे संपत आलेले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी राहाता तालुक्यातील अनेक गावातील मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत. या वेळी तालुक्यातील अनेक नागरिकांनी सुजय विखे यांच्याकडून बेताल वक्तव्य केले जात असून त्या काहीच तथ्य नसते. परंतु त्यामुळे वातावरण तणावग्रस्त होत असल्याच्या बाबी अनेकांनी घोगरे यांच्या निदर्शात आणून दिल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

kamlakar

घोगरे म्हणाल्या, निवडणुका या आपण केलेल्या पाच वर्षांच्या कामावर तसेच येणार्या काळात काय कामे करणार आहे, या मुद्दांवर होत असतात. परंतु संगमनेर व राहाता तालुक्यातील सभांमध्ये माजी खासदार सुजय विखे हे बेताल वक्तव्य करीत आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याने तरुणांसह कार्यकर्त्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. त्यांनी बेताल वक्तव्य करणे थांबवावे, अन्यथा आम्ही त्यांना जशाच तसे भाषणातून उत्तरे देऊ, असा इशारा घोगरे यांनी दिला आहे.

घोगरे म्हणाल्या की, विखे कुटुंबावर आम्हाला बोलण्याची इच्छाही नाही. पण सुजय विखे यांच्या बेताल वक्तव्यामुळे आम्हाला बोलण्याची वेळ आली आहे. विखे कुटुंबाचे राजकारण हे आता संपत आलेले असून ते संपविण्यासाठी सुजय विखे असल्यानंतर दुसरी कोणाची गरज नाही. सुजय विखेच विखे घराण्याचे राजकारण बेताल वक्तव्याने संविणार आहे. हे सांगण्याची कोणा भविषगाराची गरज नाही, असे घोगरे म्हणाल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button