Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी

कोपरगाव | प्रतिनिधी
राज्य शासनाने राज्यातील वापरात नसलेली व अत्यल्प क्षमतेने चालणारी ८० दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. त्याच अनुषंगाने गुरुवार (२ जुलै) रोजी कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील २० कैद्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. या प्रक्रियेनंतर अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला प्रत्यक्षात टाळे लागले.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यातून कैद्यांची रवानगी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील महसूल विभागाकडील ११६ दुय्यम कारागृहांपैकी ८० कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कारागृहांचा वापर अत्यल्प असल्याने, काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याने तसेच त्यांच्या देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेवर होणारा वाढता खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणानुसार संबंधित भागातील कैद्यांची व्यवस्था जवळच्या जिल्हा अथवा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरगाव येथील सर्व २० कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.


कारागृह विभागाच्या मते, या निर्णयामुळे उपलब्ध मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर होणार असून प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. तसेच कारागृह विभागावरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला टाळे लागल्यानंतर या शासकीय जागेचा भविष्यात कोणत्या कामासाठी वापर केला जाणार, याकडे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शासन या जागेचा सार्वजनिक हितासाठी पुनर्वापर करणार की अन्य शासकीय कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button