Letest News
‘विखेंनी साईबाबांच्या चरणी हात ठेवून सांगावे!’ – नगर–मनमाड रस्त्यावर निलेश लंके यांचा थेट हल्ला साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांवर डल्ला! शिर्डीत चैनस्नॅचिंग करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद-स्थ... १५० रुपयांच्या तंबाखूवर धाडसी कारवाई, पण शिर्डी राहात्यात कोट्यवधींच्या गुटखा तस्करीला अभय! शिर्डीत दलालगिरीला लगाम! भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर कलम १५२ चा चाबूक बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात झिरो टॉलरन्सचा बडगा! शिर्डीतील २ गुन्हेगारांसह ३२ सराईत आरोपींवर तडीपार प्रस्ताव नियम पाळा-नाहीतर कारवाई! शिर्डीत रिक्षाचालकांना पोलीस निरीक्षक महेश येसेकरांचा इशारा दुःखातून सेवेकडे… साईबाबा संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद-नेत्रदानातून अनेकांना नवी दृष्टी शिर्डी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी-देशभरातील ७ राज्यांत शोधमोहीम-हरवलेले ५० महागडे मोबाइल शोधून मूळ ... श्रद्धेचे सुवर्ण अर्पण-येथील साईभक्त आरती बिहानी यांचे ११.९९ लाखांचे सोन्याचे ब्रोच श्री साईचरणी अर्...
अ.नगरराजकीय

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ-‘एकच वादा अजितदादा’ घोषणांनी राजभवन दुमदुमले

मुंबई | प्रतिनिधी
कुटुंबावर कोसळलेले अपार दुःख, राजकीय पोकळी आणि पक्षाचे भवितव्य या सगळ्यांवर धीरोदात्तपणे मात करत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर शनिवारी सायंकाळी ठीक पाच वाजता राजभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यासह महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची नोंद झाली आहे.
शपथविधीच्या वेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांना स्मरून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी उपस्थित आमदार, मंत्री, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थक भावूक झाले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“एकच वादा अजितदादा… अजितदादा अमर रहे” अशा घोषणांनी राजभवनाचा सेंट्रल हॉल अक्षरशः दुमदुमून गेला.
देवगिरीवरून राजभवनाकडे भावनिक वाटचाल
शपथविधीपूर्वी सुनेत्रा पवार यांनी शासकीय निवासस्थान ‘देवगिरी’ येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून नम्र अभिवादन केले. काही क्षण मौन पाळून त्यांनी राजभवनाकडे प्रस्थान केले.


शपथ घेण्याआधीही त्यांनी अजित पवार यांना मनोमन नमन करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांचे आशीर्वाद घेऊनच आपण या जबाबदारीला सुरुवात करत आहोत, अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
दुःखातून उभारी, पक्षासाठी धाडसी पाऊल
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर पक्षावर मोठे संकट ओढावले होते. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत पक्षाची धुरा हाती घेतली.


पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी त्यांनी हे जबाबदारीचे पद स्वीकारल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
महिला नेतृत्वाचा नवा अध्याय
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. राजकारणात संयम, शांतता आणि ठाम निर्णयक्षमता यांचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेतून त्या राज्याच्या विकासाला नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button