Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

“२८ वर्षांपासूनचा निवारा नियमित करा!” — अण्णाभाऊ साठे नगरातील ९ कुटुंबांची शासनाकडे आर्त मागणी

शिर्डी : शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात सुमारे १९९५ पासून वास्तव्यास असलेल्या ९ गोरगरीब व मागासवर्गीय कुटुंबांनी त्यांच्या घरांचे अतिक्रमण नियमित करण्यासाठी महसूल मंत्र्यांकडे निवेदन सादर केले. “आम्ही अनेक वर्षांपासून येथे राहतो, शासनाचे सर्व नियम पाळतो; तरीही आजपर्यंत आमच्या नावावर जमीन नोंद नाही,” अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.
📜 शासन निर्णय असूनही कारवाईचा अभाव!
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४०, ५१ व ६४ तसेच नियम १९७१ मधील तरतुदींनुसार १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा शासन निर्णय आहे. त्याचप्रमाणे “सर्वांसाठी घरे २०२२” या धोरणांतर्गत भूमिहीनांना घरे देण्याची तरतूद असतानाही संबंधित कुटुंबांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


👨‍👩‍👧‍👦 मोलमजुरीवर गुजराण, तरीही हक्कासाठी संघर्ष
सदर कुटुंबे ही अत्यंत गरजू असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. अनेक वर्षांपासून ते पाणीपट्टी व वीजबिल भरत असून मतदार म्हणूनही नोंद आहेत. “आमच्याकडे दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही; आमच्या घरांचा प्रश्न सोडवून आम्हाला न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
🤝 भारतीय लहुजी सेनेच्या पुढाकारातून निवेदन सादर
भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर वीर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित नागरिकांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना शिर्डी कार्यालयात निवेदन दिले. या निवेदनामुळे प्रशासनाच्या पातळीवर हालचाली होऊन या कुटुंबांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


⚖️ सातबाऱ्यावर नावाची नोंद होण्याची मागणी

निवेदनाच्या माध्यमातून संबंधित कुटुंबांनी त्यांच्या घरांचे अतिक्रमण नियमानुसार नियमित करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्याची मागणी केली आहे. शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करून या कुटुंबांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची वेळ आता आली असल्याचे मत स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
👉 “शासन निर्णय आहे, पात्रताही आहे… आता फक्त अंमलबजावणीची गरज!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button