
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीमध्ये शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. गुंतवणूकदारही आता आपले गुंतवलेले पैसे परत मिळतील की नाही या चिंतेत असून काही दबक्या तर काही नाव न सांगण्याच्या अटीवर बोलत आहे. तशी चर्चा सुरू आहे. शेवगाव ,कोल्हापूर येथेही शेअर्स ट्रेडिंग च्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचे नुकतेच उघड झाले आहे .
कोल्हापूरला शेअर्स ट्रेडिंग च्या नावाखाली गुंतवणूकदारांच्या कोट्यावधी रुपयाला गंडा घालणाऱ्या दांपत्यास अटक करण्यात आली आहे. शिर्डीतही शेवगाव कोल्हापूर प्रमाणे त्याची पुनरावृत्ती घडते की काय? असे गुंतवणूकदारांमधून चर्चा ऐकू येत आहे. या प्रकरणी वरवर शांतता असली तरी आतून मात्र मोठी खळबळ उडाली आहे. , ,
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान आहे व येथे कोणतेही घटना घडली तर तिचा गवगवा हा देशात नव्हे विदेशातही होत असतो. असाच प्रकार या शेअर्स ट्रेडिंगच्या प्रकारामुळे सर्वत्र झाला आहे. ग्रो मोर ट्रेडिंग नामक कंपनी कडून शिर्डी येथील एका प्रतिष्ठित व आंतरराष्ट्रीय अशा मोठ्या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचारी राजाराम पाटील साळवे,यांचे चिरंजीव भूपेंद्र पाटील साळवे यांनी ग्रो मोर ट्रेडिंग कं. च्या नावाने मोठ्या व्याजाचा परतावा देण्यात येईल असे गुंतवणूकदारांना सांगून गुंतवणूक केली.
त्यासाठी आपले दोन चुलत भाऊ सुबोध पाटील साळवे व संदीप पाटील साळवे तसेच आणखी एक असे चौघांनी मिळून गुंतवणूकदारांना मोठी परतावे मिळण्याचे अमिषे दाखवून गुंतवणूक केली. कमी कालावधीत जास्त नफा प्रथम गुंतवणूकदारांनाही मिळत गेला. तसे व्यवस्थाही कंपनीने केली होती. त्यामुळे माऊस ऍडव्हर्टाईस झाली. प्रथम एक लाख रुपये मुद्दल गुंतवणुकीसाठी मर्यादा होते. ती बंद करून तीन लाख रुपये मर्यादा करण्यात आली.
अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने पैसे जमा करून तसेच आपले मित्र नातेवाईक यांना कमी वेळेत जादा व्याज मिळते म्हणून या ग्रो मोर शेअर्स ट्रेडिंग नामक कंपनीत मोठी रक्कम गुंतवणूक केली. प्रथम अनेकांना परतावा मिळाल्यामुळे प्रत्येकाची आशा वाढत गेली व अनेकांनी मोठमोठी रक्कम गुंतवली. हळूहळू गुंतवणूकदारांची साखळी वाढत गेली व कोट्यावधी रुपये जमा होत गेले नंतर मात्र गुंतवणूकदारांना परतावा देण्याचा विलंब होत राहिला.
आता तर परतावा म्हणजे व्याज तर सोडाच मुद्दलही या कंपनी व कंपनी चालवणाऱ्यांकडून मिळेल का? अशी शंका आता गुंतवणूकदारांमध्ये येऊ लागली असून तशी शंका येथे खाजगीत व्यक्त करत आहेत. या ग्रो मोर ट्रेडिंग कंपनी संदर्भात गुंतवणूकदारांमध्ये जी चर्चा सध्या सुरू आहे .
ती चर्चा साई दर्शन पोर्टलवर वृत्त म्हणून प्रसिद्ध केले गेले. व या वृत्तामुळे शिर्डीत नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली.आणि लगेच दोन-चार तासातच अनेक दिवस फोन न उचलणारे व शिर्डीत नसणारे भूपेंद्र पाटील यांनी गुंतवणूकदारांच्या व्हाट्सअप ग्रुपला व्हिडिओ शेअर केला. व त्यामध्ये भावनिक आवाहन गुंतवणूकदारांना केले. इतके दिवस साथ दिली यापुढेही द्या, असे आवाहन केले. मात्र गुंतवणूकदारांचे घेतलेले पैसे कधी देणार?
ते कुठे गुंतवले आहेत? गुंतवणूकदारांना बँकेत पतसंस्थेपेक्षाही जादा व्याज कशा प्रकारे दिले जाते? एवढ्या मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपये जमा झालेले असताना शासनाला इन्कम टॅक्स भरला जातो की नाही? अशाप्रकारे कोट्यावधी रुपये जमा करून व्यवहार करणे, मोठ्या टक्केवारीने व्याज देणे. यासंदर्भात व कंपनीच्या संदर्भात संपूर्ण खुलासा होणे गरजेचे आहे. हा सर्व आर्थिक व्यवहार कोट्यावधी रुपयांचा आहे.
तो अधिकृत असो व अनधिकृत असो मात्र त्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या संदर्भात शासनाच्या आर्थिक संदर्भातील ईडी सारख्या अनेक संस्था शासनाच्या आहेत. पोलीस आहेत. त्यांनीही आता या गुंतवणूकदार व आम जनता यांच्या या दबक्या आवाजातील चर्चेला उघड करण्यासाठी या ग्रोमोर शेअर्स ट्रेडिंग कंपनीची चौकशी केली पाहिजे. या कंपनीचे सर्व अकाउंट, त्यावरील गेल्या चार-पाच वर्ष पासूनचे आर्थिक व्यवहार, या कंपनीच्या व्यक्ती, त्यांची उत्पन्न व संपत्ती ,
याविषयी सखोल चौकशी होणे गरजेचे असून हा देश कायद्यावर व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर चालतो. त्यामुळे कायद्याने या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी.व जय खरेआहे ते जनतेसमोर यावे. यासाठी प्रशासकीय स्तरावरून या संदर्भात चौकशी होण्याची गरज आहे.असे आता सर्वसामान्य नागरिक तसेच गुंतवणूकदारांमधूनही खाजगीत बोलले जात आहे.