आमचे दादा गेले… निशब्द” — महिंद्रा शेळके पाटील यांची आदरणीय अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
आदरणीय अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्र राज्याचे प्रचंड नुकसान झाले असून, कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महिंद्रा शेळके पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

“आमचे दादा गेले… निशब्द,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, अजितदादा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. शिस्त, कामाचा ध्यास आणि वेळेची किंमत याचे महत्त्व आम्ही दादांकडूनच शिकलो, असे त्यांनी नमूद केले.
अजितदादा हे केवळ एक प्रशासक किंवा राजकीय नेते नव्हते, तर आपल्या कार्यपद्धतीतून सातत्याने प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कामातील शिस्त, स्पष्टता आणि निर्णयक्षमता ही सर्वांसाठी आदर्शवत होती. आम्ही आमच्या संपूर्ण कुटुंबासह नेहमीच त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहत आलो आहोत, असेही महिंद्रा शेळके पाटील यांनी सांगितले.
“दादा, तुमची कार्यपद्धती, तुमची शिस्त आणि तुमची प्रेरणा आमच्या कुटुंबाच्या विचारांमध्ये कायम जिवंत राहील,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत भावना व्यक्त केल्या.
शेवटी त्यांनी “भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 ॐ शांती 🕊️” असे म्हणत आदरणीय अजितदादांना अखेरचा निरोप दिला.

