Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
Blog

सुजय दादांच्या कार्ड-मोजणीवर आक्षेप_अन्याय बंद न झाल्यास ५ तारखेपासून आमरण उपोषणाचा आरणे यांचा थेट इशारा

शिर्डी शहरातील नागरिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी आता संयम सोडत थेट संघर्षाचा इशारा दिला आहे. सुजय दादा यांनी आणलेल्या कार्डच्या आधारे तसेच जागा मोजणीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरले जात असून, हा प्रकार तात्काळ थांबवण्यात यावा, अशी ठणकावून मागणी त्यांनी मुख्याधिकारी सतीश दिघे यांना केली आहे.
कार्ड व मोजणीच्या प्रक्रियेच्या आडून नागरिकांमध्ये भीती, दहशत आणि मानसिक त्रासाचे वातावरण निर्माण केले जात असल्याचा गंभीर आरोप करत, प्रशासनाने जर अजूनही डोळेझाक केली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असा थेट इशारा आरणे यांनी दिला आहे.
“हा लढा माझा वैयक्तिक नाही, तर शिर्डीतील सामान्य नागरिकांच्या हक्कांचा आहे,” असे ठामपणे सांगत, दिनांक ५ पासून आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णायक निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. प्रशासन हलले नाही, तर हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे शिर्डीच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. प्रशासन न्याय देणार की नागरिकांना रस्त्यावर उतरायला भाग पाडणार, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संपूर्ण शहराचे लक्ष आता मुख्याधिकारी काय निर्णय घेतात याकडे लागले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button