Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

शिर्डीत प्रसाद वितरणात बदल-प्रत्येक भाविकाला एकच लाडू पाकीट

शिर्डी | प्रतिनिधी
देशात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर त्याचा परिणाम आता शिर्डीतील श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्यावरही दिसू लागला आहे. इंधनाची बचत आणि गॅसचा वापर नियंत्रित करण्याच्या उद्देशाने संस्थानाने महत्त्वाचा निर्णय घेत आजपासून साईभक्तांना प्रसाद म्हणून प्रत्येक भाविकाला केवळ एकच लाडू प्रसाद पाकीट देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या निर्णयाबाबत संस्थानाच्या लाडू काउंटरवर स्पष्ट सूचना लावण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद म्हणून एकच लाडू पाकीट दिले जाणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डीत दररोज देश-विदेशातून हजारो साईभक्त दर्शनासाठी येत असतात. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसाद म्हणून लाडू घेण्याची परंपरा असल्यामुळे संस्थानाच्या प्रसादालयात दररोज मोठ्या प्रमाणावर लाडू तयार केले जातात. सध्या दररोज सुमारे ४० ते ४५ हजार लाडू पाकिटांची विक्री होत असते. त्याचबरोबर सुमारे ५० हजार बुंदी प्रसाद पाकिटांचे मोफत वितरण देखील संस्थानाकडून करण्यात येते.


या सर्व प्रसाद निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर गॅसचा वापर करावा लागतो. सध्या देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या परिस्थितीचा विचार करून संस्थानाने गॅसचा वापर काटकसरीने करण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानाकडे सध्या सुमारे २० दिवस पुरेल एवढा गॅस साठा उपलब्ध असला तरी भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन इंधन बचतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.


पूर्वी अनेक भाविक स्वतःसाठी तसेच आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि ओळखीच्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर लाडू प्रसाद घेऊन जात असत. त्यामुळे लाडू पाकिटांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत होती. परिणामी प्रसाद निर्मितीचा खर्च तसेच गॅसचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढत होता.


दरम्यान सध्याच्या परिस्थितीत गॅसचा वापर नियंत्रित ठेवणे आवश्यक असल्याने संस्थानाने ही मर्यादा लागू केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक भाविकाला केवळ एकच लाडू प्रसाद पाकीट देण्यात येणार असून भाविकांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.
गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाने घेतलेला हा निर्णय सध्या शिर्डीत चर्चेचा विषय ठरत असून भाविकांकडूनही या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button