Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
राजकीयशिर्डी

शिर्डीतील लक्ष्मीनगर अतिक्रमण हटविण्यास सुरुवात नागरिकांकडून स्वयंस्फूर्तीने सहकार्य

शिर्डी | प्रतिनिधी
Shirdi Sai Baba Temple परिसरातील लक्ष्मीनगर भागात अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून येथील नागरिक स्वतःहून आपली घरे, दुकाने आणि शेड काढून घेऊ लागले आहेत. Shirdi Nagar Parishad प्रशासनाने १० मार्चपर्यंतचा अंतिम अल्टिमेटम दिल्यानंतर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी रहिवासी प्रशासनाला सहकार्य करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


लक्ष्मीनगर परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत होता. मात्र, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर प्रशासनाने या प्रश्नावर ठोस भूमिका घेत कारवाईची तयारी सुरू केली. प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर संभाव्य कारवाईपूर्वीच अनेक रहिवाशांनी आपली बांधकामे हटवण्यास प्राधान्य दिले आहे.

अतिक्रमण काढताना नागरिक स्वतःच पत्रे, दरवाजे, खिडक्या तसेच इतर बांधकाम साहित्य ट्रॅक्टरमधून हलवताना दिसत आहेत. या प्रक्रियेसाठी नगरपरिषदेच्या वतीने साहित्य वाहून नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भर उन्हातही नागरिक आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवताना दिसत आहेत.
राहाता तालुक्यातील शिर्डी, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक आणि निमगाव कोहाळे या गावांमधील बहुतांश अतिक्रमणे यापूर्वीच हटविण्यात आली आहेत.


काही ठिकाणी विस्थापित अतिक्रमणधारकांना अर्धा गुंठा जागा देण्यात आली असून उर्वरित प्रकरणांमध्ये प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. भविष्यात शासनाच्या योजनांद्वारे हक्काची जागा आणि निवारा मिळेल, या विश्वासामुळे नागरिक प्रशासनाला सहकार्य करत स्वतःहून अतिक्रमण हटवताना दिसत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button