Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
राजकीयशिर्डी

एकेकाळचे “महापुढारी”आज तिकिटासाठी दारोदार — शिर्डीचा ऐतिहासिक राजकीय अपमान-सुभाष कोतकर

शिर्डी :
शिर्डीच्या सुकाणू समितीतील काही ठराविक पुढारी गावाच्या राजकारणाला मार्गदर्शन तर दूरच, पण स्वतःचा मान राखण्याइतकेही सामर्थ्य ठेवत नाहीत, असे करारी आणि धक्कादायक चित्र आता उघड झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी कमलाकर कोते यांनी सभेत केलेले विधान —
“अशा पुढाऱ्यांनी कोरड्या विहिरीत उडी मारून जीव द्यावा!”
— हे त्या वेळी अतिशयोक्ती वाटत असले, तरी आज परिस्थिती पाहता ते अक्षरशः सत्य आणि वास्तव भासू लागले आहे.

sai nirman
जाहिरात

एकेकाळचे “महापुढारी”, आज तिकिटासाठी दारोदार — शिर्डीचा ऐतिहासिक राजकीय अपमान

शिर्डीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशा मोठ्या “पुढाऱ्यांची” इतकी अवहेलना होताना दिसत आहे.
पूर्वी हेच लोक
“एका वार्डात चार-चार, आठ-आठ नगरसेवक आम्ही बसवतो”
असे आव आणून बोलत.
गावात त्यांचा शब्द अंतिम, आदेश म्हणजे कायदा, आणि त्यांच्या दारात तिकिटांसाठी रांगा लागत — हीच शिर्डीने पाहिलेली वर्षानुवर्षांची वास्तवता.

DN SPORTS

परंतु आज परिस्थिती अशी की —
👉 यांच्याच नावाचे तिकीट मिळावे म्हणून यांनाच रांगेत उभे राहावे लागत आहे!
👉 ज्या तिकिटावर इतरांच्या नशिबी राजकीय भवितव्य लिहिले जात होते, तेच तिकीट मिळवण्यासाठी आज हेच पुढारी विनंती, याचना, चापलुसी करत आहेत!
👉 गावाने दिलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःला सर्वेसर्वा समजणाऱ्यांचा गर्व अक्षरशः धुळीला मिळालेला आहे.

ही स्थिती म्हणजे शिर्डीतील राजकारणातील सर्वात मोठी शोकांतिका.


“राईस प्लेट”वर आणलेले पुढारी — विखे पाटलांच्या एका निर्णयाने जमिनीवर

माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका निर्णायक राजकीय पावलाने शिर्डीतील काही जाडजूड, अहंकारी आणि स्वतःला अजेय समजणारे पुढारी थेट जमिनीवर आले.
लोकांनी वर्षानुवर्षे सांभाळलेल्या त्यांच्या प्रतिमेचा फुगा क्षणात फुटल्यासारखा.

आज अशी वेळ आली आहे की —
गावाचे नेतृत्व गाव स्वतः घेऊ शकत नाही.
गावाचा कणा तुटला आहे, निर्णयक्षमता नाहीशी झाली आहे, आणि जे गाव इतरांना दिशा देत होते, तेच आज इतरांच्या झेंड्यावर चालत आहे.

kamlakar

याचाच संदर्भ देत मोठा टोला मारला जात आहे —
“दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची तयारी ठेवा!”


सुभाष कोतकरांची परखड प्रतिक्रिया — “गाव संपत चाललंय, पण नेते जमिनीवर येत आहेत… यातच समाधान”

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे सुभाष शामराव कोतकर यांनी या सर्व घटनेवर अगदी निशाण्यावर बोट ठेवत प्रतिक्रिया दिली.
त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले—

“ज्यांनी शिर्डीच्या राजकारणाचा कारभार हातातून जाऊ दिला, ज्यांनी स्वतःला सर्वकाही समजले, ज्यांनी वार्डानुसार सत्ता वाटून आपली मक्तेदारी निर्माण केली — आज त्यांचीच स्थिती बिकट झाली आहे. अशा लोकांना जमिनीवर आणल्याबद्दल आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचे लाख लाख आभार मानतो.”

तसेच त्यांनी पुढे अधिकच धारदार भाषेत म्हटले —
“साईंच्या कृपेने शिर्डीतील गोर-गरीबांना न्याय देणारे पुढारी अजूनही आहेत. पण या गावाला खाऊन टाकणाऱ्या मुठभर लोकांचा खरा चेहरा आता जनतेसमोर आलाय. हीच खरी लोकशाही!”


शिर्डीकरांनी जागं व्हायची वेळ! — आजचा दिवस गावाच्या भविष्याचं वळण

आज जे घडत आहे, ते फक्त राजकारणातील बदल नाही —
हे शिर्डीच्या आत्म्याचे जागरण आहे.

👉 स्वतःला अजिंक्य समजणाऱ्या पुढाऱ्यांचा गर्व कसा चिरडला जातो,
👉 जनतेसमोर ‘महापुढारी’ म्हणवणारे किती पोकळ आहेत,
👉 आणि गावाचा निर्णय गावाकडे राहिला नाही तर काय अधोगती होते,

याचा आज प्रत्यक्ष पुरावा शिर्डी पाहत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button