Letest News
मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह...
क्राईमशिर्डी

कालिका नगर येथील एस एस फायबरच्या कारखान्याला लागली आग 

शिर्डीतील कालिकानगर परिसरातील एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यामुळे जवळपास 40 लाखांच्या नुकसानीची माहिती कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ दाखल होऊन आग विझवली. सध्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू असून, अधिक तपासासाठी स्थानिक अधिकारी घटनास्थळी आहेत.

एसएसएस डोअर फायबर गोडाऊनला आग लागल्याचं समजताच शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि साहित्य साठवलेलं असल्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका होता,

मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे आगीचा लोन रोखता आला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेमुळे जाधव यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कारखाना अगदी भरवस्तीत आहे आगीचे लोन जास्त प्रमाणात होते

त्याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि दरवाजे बनवण्याचे लिक्विडचे वास संपूर्ण परिसरात येते त्यामुळे तेथील रहिवासी ह्या वासाने ट्रस्ट झालेले आहेत

भर लोक वस्तीत ह्या दरवाज्यांचे कारखान्यास परवानगी दिली कोणी कि विना परवानगीनेच याठिकाणी हा कारखाना थाटला आहे याची चौकशी होऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊन हा कारखाना तेथून हलवावे अशी मागणी कालिका नगर येथील रहिवासी यांनी केली आहे 

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button