Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
राजकीयशिर्डी

लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून प्रभाग ६ (अ) मध्ये ताराचंद नाना शेजवळांची दमदार एन्ट्री — बदलाचा बिगुल वाजला!

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

ताराचंद नाना म्हणाले, “रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता—या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. बदलाची गरज लोकांनी अनेक वर्षे अनुभवली, आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे.”

प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटारव्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या १०० दिवसांत ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटारलाइनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल.

DN SPORTS

स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी, यावर बोलताना त्यांनी सांगितले, “ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते. जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजीविरहित प्रशासन शक्य आहे.”

तरुणांसाठी क्रीडा व कौशल्यविकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयं-सहायता गटांना पाठबळ तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल. मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेन,” असे ते म्हणाले.

शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, “मी वचन नव्हे—काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे. प्रभाग ६ (अ) चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button