Letest News
साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ शिर्डीहून परतणाऱ्या भाविकाला चाकूचा धाक दाखवून लूट-श्रीरामपुरात दोन आरोपी जेरबंद शिर्डीत गॅसचा काळाबाजार? घरगुती सिलेंडरचा हॉटेलमध्ये सर्रास वापर- ९०० रुपयांचा सिलेंडर २ हजारात विक्... साई एम्प्लॉईज सोसायटीचे कार्य ठरले आदर्श-गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिधावाटप कार्यक्रम उत्साहात कृषी क्षेत्र देशाच्या अन्नसुरक्षा व आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
अ.नगरराजकीय

तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव खासदार लंके

खासदार लंके यांनी हंगे येथे आज बोलताना दिली. ते म्हणाले की, मॉक पोल घेतला, तरी माझा निवडणूक आयोगाच्या यंत्रणेवर शंभर टक्के विश्वास आहे. या यंत्रणेमध्ये फेरफार, बदल होत नसतो. लोकसभेची निवडणूक ही देशाचे भवितव्य घडविणारी निवडणूक आहे.

sai nirman
जाहिरात

या यंत्रणा, मशिन मॅनेज होत असत्या, तर लोकांनी रात्रंदिवस समाजासाठी काम केले नसते. फक्त मशिन मॅनेज केले असते, असा टोलाही लंके यांनी लगावला. एकाही मतदान केंद्रावर गडबड आढळणार नाही. निवडणूक आयोगाची ही यंत्रणा आहे. प्रत्येक मशिन मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्याची तपासणी केली जाते.

मॉक पोल घेतला जातो. त्यानंतर ते मतदान मोजले जाते व त्यानंतरच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यामुळे कोठेही हेराफेरी होणार नाही. मग त्यावर चर्चा कशाला, असा सवाल लंके यांनी केला.

DN SPORTS

निवडणुकीच्या काळात यंत्रणा मॅनेज करायची आणि निवडणुकीला सामोरे जायचे, असे त्यांचे काम आहे. आता फेरमतमोणीची मागणी म्हणजे रडीचा डाव आहे. आपलं अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे अशी प्रतिक्रियाही खा. नीलेश लंके यांनी दिली.लंके म्हणाले, ईव्हीएम मशिनबाबत वास्तविक आम्ही तक्रार करायला हवी होती. देशात तुमचे सरकार आणि तुम्हीच यंत्रणेवर अविश्वास दाखवत असाल, तर याचा अर्थ तुम्ही कोणाशीच प्रामाणिक नाहीत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button