Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरक्राईम

खून केल्याचा फोन,आरोपी अटक !

कोपरगाव प्रतिनिधी / “कोपरगाव शहरात हनुमान नगर येथील गेट येथे आपल्या सावत्र भावाचा खून झाला असून त्याचे प्रेत एका इसमाने गोणीत घालुन जाताना आपण पाहिले असून आपण ताबडतोब घटनास्थळी हजर व्हावे” असा फसवा फोन पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर करून कोपरगाव शहर पोलिसांची फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी परशराम रावसाहेब दिघे (वय-३१) या त्याच भागातील तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी राज्याचे पोलीस कायमच धावून येतात.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अडचणीच्या काळात नागरिकांना अधिक वेगवान मदत मिळावी यासाठी राज्य पोलिसांनी मदतीसाठीचा डायल ११२ योजना सुरु केली आहे.पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर ८सप्टेंबर २०२१ ला या योजनेला सुरुवात केली आहे.या योजनेच्या माध्यमातून अडचणीच्या काळात ११२ नंबर डायल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ०७ मिनिटामध्ये पोलिसांची नागरिकांना मदत मिळत आहे.त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले असून ही सुविधा लोकप्रिय ठरली आहे.

मात्र या सुविधेचा दुरपयोग करून त्यांची दिशाभूल करणाऱ्या असामाजिक तत्त्वांची कमी नाही असे वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.शहर पोलिस ठाण्यात मागे काही महिन्यांपूर्वी अशीच घटना उघडकीस आली होती.

दरम्यान यातील आरोपीने शहर पोलिसांना फोन करून,”आपल्या शहरातील हनुमाननगर येथील गेट समोर आपल्या सावत्र भाऊ संतोष अडांगळे याचा पहाटे ०३ वाजता खून झाला असून त्याला गोणित घालुन दुसराआरोपी पवार हा घेऊन जाताना आपण पाहिले असल्याचे असत्य कथन केले होते.त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके,पो.कॉ.धोंगडे,श्री साळुंके आदी अन्य सहकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी रवाना केले असता त्या ठिकाणी सदर पथक गेले होते.

सदर ठिकाणी पोलिसांनी तपास केला असता अशी कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिल्यावर पोलिसांचे डोके चक्रावून गेले असता त्यांनी फोन करणाऱ्या इसमाचा शोध घेतला होता.त्याने आधी फोन उचलला नाही.मात्र त्याचा शोध घेतला असता त्याने त्यास दुजोरा दिला होता.

दरम्यान खात्री कारणासाठी त्याची पत्नी रत्नमाला दिवे हिच्याकडे त्याबाबत शोध घेतला असता तिने मयताचा फोन ( ७२१८० १९६५८) पोलिसांना दिला असता त्यावर पोलिसांनी डायल केले असता सदर इसम जिवंत असल्याची पोलिसांची खात्री झाली.त्यामुळे आरोपी इसम परशराम दिवे याने पोलिसांना खोटा फोन करून त्यांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान पोलिसांनी आरोपी परशुराम दिवे याचेवर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्यास अटक केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बबन तमनर हे करत आहेत.

“दरम्यान नागरिकांनी कोणत्याही घटनेची पडताळणी केल्याशिवाय पोलिसांना खोटा फोन करून दिशाभूल करू नये;असे केल्यास आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी” असे आवाहन कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button