Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
अ.नगरशिर्डी

शिर्डीला प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री व उद्योगपती गौतम सिंघानिया यांची भेट व घेतले साईबाबांचे दर्शन!

शिर्डी (प्रतिनिधी) देशातच नव्हे तर देशाबाहेरही आपला विश्वास बसणार नाही इतके साईबाबांचे भक्त आहेत. आपण क्रिकेटच्या निमित्ताने अनेक देशात जातो वेस्टइंडीज ,इंग्लंड ऑस्ट्रेलिया आदी सर्वच सर्व देशांमध्ये श्री साईबाबांना मानणारे खूप मोठ्या संख्येने साईभक्त आहेत. दिवसेंदिवस साईबाबांची महती वाढतच आहे. असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

प्रसिद्ध उद्योगपती गौतम सिंघानिया व माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी गुरुवार 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्‍यांचा सत्‍कार केला. यावेळी उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू रवी शास्त्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की,

आपण गेल्या 40 वर्षापासून शिर्डीला साई दर्शनासाठी येत असतो. येथे आल्यानंतर साईबाबांचे दर्शनच महत्त्वाचे आहे. क्रिकेट सेकंडरी आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये येथे मोठा बदल झाला आहे. दररोज साठ हजार साई भक्त येथे येतात असे समजले. येथे नेहमी गर्दी असते. देशाप्रमाणे परदेशातही आपण क्रिकेटच्या निमित्ताने जात असतो तेथेही मोठ्या संख्येने साईभक्त आहेत.

असे सांगत पूर्वीचे क्रिकेट व आताचे क्रिकेट यात खूप बदल झाल्याचे विचारताच सर्व काही बदलत असते. क्रिकेटही बदलत आहे. क्रिकेट बदलणार , क्रिकेटचा खेळ बदलणार, क्रिकेटचे खेळाडू बदलणार !मात्र साईबाबांचे दर्शन व मिळणारी शांती ही चिरकाल तसच राहणार, असं सांगितलं .

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button