Letest News
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक “गेम चेंजर” ठर... गावठी कट्टा घेऊन फिरणारे तिघे जेरबंद- 7.82 लाखांचा मुद्देमाल हस्तगत शिर्डीत लोकशाहीचा उघड उघड खून! मतदारांच्या माथी उमेदवार लादणाऱ्यांना शिर्डीकडून थेट इशारा! शिर्डीत ट्रॅव्हल्सची दादागिरी! लहान बाळासह साईभक्त महिलेला मध्यरात्री बसमधून हाकलण्याचा प्रकार — साई... ५१ लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगतस्थानिक गुन्हे शाखेने ५७२.७५ ग्रॅम सोनं जप्त करून फिर्यादीस दिला न्... शिर्डी नगरपरिषद निवडणुकीसाठी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांची निरीक्षक... मालेगावमध्ये अतिक्रमण मोहिमेने शेकडो नागरिक बेरोजगार —मातोश्री हाॅकर्स युनियन संस्थापक जगदीश गो-हेच्... फरार खुनाचा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली अ... शिर्डीच्या २५ वर्षांच्या राजकीय इतिहासातील भयाण शांतता! अनेक इच्छुक अजूनही आदेशाच्या प्रतीक्षेत-शिर्... शिर्डीतील रस्त्यांची दयनीय अवस्था — खड्डेमय रस्त्यांनी घेतले निष्पापांचे बळी! लोकप्रतिनिधी तथा नामदा...
Blog

माझी माती माझा देश’ अभियानामुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी

अहमदनगर दि. 20 ऑक्टोबर (जि.मा.का.वृत्तसेवा ) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात ‘माझी माती माझा देश’ हे अभियान अतिशय चांगल्याप्रकारे राबविण्यात आले असून या अभियानांमुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.

sai nirman
जाहिरात
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहा आयोजित 'माझी माती माझा देश' अमृत कलश जिल्‍हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्‍याच्‍या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

        यावेळी  महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगर पालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर, मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, तहसीलदार शिल्पा पाटील, नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात आदी उपस्थित होते.

        सुहास मापारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या 'माझी माती माझा देश' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रभागात विविध कार्यक्रम आयोजित करून अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी संकलित झालेले अमृत कलश मुंबई येथे व तेथून राजधानी दिल्लीला एकत्रित होणार असून त्या ठिकाणी अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे.  या कार्यक्रमातून जनमानसमध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन एकतेचा संदेश यातून दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

          जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच क्षेत्रातून आणि सर्व गावात अमृत कलश संकलित करण्यात आले. यावेळी संकलित झालेल्या कलशांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायत तसेच महानगरपालिकेच्या कलशांचे एकत्रिकरण करण्यात येऊन अमृत कलश अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.

        या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी तर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, विजय बडे यांनी आभार मानले.

        या कार्यक्रमास हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, मनपा चे शशिकांत नजान यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या नगर परिषदांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button