Letest News
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटइशारा देऊनही संस्थान-नगरपरिषद सुस्त अखेर साईभक्त महिलेवर कु... पती बेपत्ता म्हणून पत्नीची पोलिसांत तक्रार शोध घेताना समोर आला धक्कादायक प्रकार! पत्नीच्या नावाने रू... पैशांसाठी विवाहितेचा छळ चारित्र्यावर संशय घेत मारहाण‘गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आण नाहीतर जिवंत सो... ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुखपदी बाळासाहेब गाडेकर
राजकीयशिर्डी

वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत

शिर्डी : एकेकाळी घरातील आजोबा, वडील सकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन देश-विदेशातील घडामोडी वाचत असत. त्या वातावरणात वाढणाऱ्या मुलांच्या मनात नकळत वाचनाची आवड निर्माण होत असे. पुस्तक, वर्तमानपत्र आणि ज्ञान यांचा सुगंध प्रत्येक घरात दरवळत होता. याच संस्कारातून ग्रामीण भागातील अनेक मुले डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि अधिकारी बनली.
मात्र आजचे चित्र चिंताजनक असल्याची खंत व्यक्त करत श्री साई निर्माण इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक संदीप डांगे सर यांनी समाजाला विचार करायला भाग पाडणारे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, आजच्या पिढीच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल आला आहे. वाचनाची जागा रिल्स, व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियाने घेतली आहे. त्यामुळे मुलांची विचारशक्ती, भाषिक कौशल्ये आणि अभ्यासाची गोडी कमी होत चालली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डांगे सर म्हणतात, “मुले उपदेशाने नाही तर अनुकरणाने शिकतात. आज आई-वडील स्वतः मोबाईलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे मुलांवरही त्याच गोष्टींचे संस्कार होत आहेत. घरात वर्तमानपत्र वाचन, पुस्तकांची चर्चा आणि ज्ञानाचे वातावरण कमी होत असल्याने मुलांची वाचनाशी असलेली नाळ तुटत चालली आहे.”
त्यांनी पालकांना आवाहन केले की, मुलांसमोर मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि स्वतः वाचनाची सवय लावावी. कारण मुलांना वाचनाचे महत्त्व सांगण्यापेक्षा ते कृतीतून दाखवणे अधिक प्रभावी ठरते. घरातील मोठी मंडळी पुस्तक वाचताना दिसली, तर मुलांमध्येही वाचनाची प्रेरणा निर्माण होईल.
आज अनेक लहान मुलांची सोशल मीडियावर खाती आहेत, ते रील स्टार बनण्याचे स्वप्न पाहतात; मात्र ज्ञान, विचार आणि संस्कारांचा पाया मजबूत करणारे वाचन मागे पडत आहे. ही स्थिती भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे डांगे सरांनी स्पष्ट केले.


समाज, पालक आणि शिक्षक यांनी वेळेवर जागे होऊन मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली नाही, तर भविष्यात वैचारिकदृष्ट्या कमकुवत पिढी तयार होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. “डिजिटल युगात तंत्रज्ञान आवश्यक आहे, पण ते पुस्तकांची जागा घेऊ शकत नाही. घराघरांत पुन्हा एकदा वाचनाचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.
शिक्षणाच्या पंढरीतील एका वारकऱ्याची ही तळमळ केवळ शिक्षकाची नाही, तर संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी हाक आहे. आजही वेळ गेलेली नाही; मुलांच्या हातात मोबाईलसोबत पुस्तकही दिले, तरच उद्याची पिढी ज्ञानवान, संस्कारी आणि विचारसंपन्न घडेल.
✍️ “वाचन संस्कार हीच पुढच्या पिढीसाठी खरी संपत्ती” — संदीप डांगे सर

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button