Letest News
कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी शिक्षणातील आर्थिक साक्षरता' : योग्य माहिती असेल तर पैशांची अडचण ठरत नाहीशिक्षण महाग नाही… योग्य नियो... दीड लाखांचे दागिने आणि व्हिसा असलेली पर्स साईभक्ताला सुखरूप परत । सोन्याचे दागिने-व्हिसा अन् प्रामाण... कट्टर शिवसैनिक नानक सावंत्र यांची जिल्हा मुष्टीयुद्ध संघटनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती-शिर्डीत अभिनंद... २२ महिने उलटले… तरीही ५९८ कामगारांना सेवा लाभ नाहीत मुख्यमंत्री फडणवीसांकडे डॉ. राजेंद्र पिपाडांची न... घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच-ग्रामविकास अधिकारीसह तिघांवर एसीबीचा सापळा प्रेम-पैसे आणि 'खंडणी'चा गुंता-आता सत्य बाहेर काढणार तपास! शिर्डीत योगेश तिया प्रकरणाची जोरदार चर्चा मतदारांनो सावधान! SIR-2026 अंतर्गत घरभेटीला सहकार्य करा-नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांचे आवाहन शिर्डीत नाही-थेट मुंबईत धाव…! योगेश तिया यांच्या फिर्यादीभोवती संशयाचे धुके-खंडणीचा गुन्हा आधी की बल... वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन
अ.नगरक्राईम

कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला अखेर टाळे-२० कैद्यांची कडेकोट बंदोबस्तात नाशिकला रवानगी

कोपरगाव | प्रतिनिधी
राज्य शासनाने राज्यातील वापरात नसलेली व अत्यल्प क्षमतेने चालणारी ८० दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा घेतलेला निर्णय आता प्रत्यक्षात उतरू लागला आहे. त्याच अनुषंगाने गुरुवार (२ जुलै) रोजी कोपरगाव येथील दुय्यम कारागृहातील २० कैद्यांना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले. या प्रक्रियेनंतर अनेक वर्षांचा इतिहास असलेल्या कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला प्रत्यक्षात टाळे लागले.
सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यातून कैद्यांची रवानगी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


राज्य शासनाने १२ जून २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील महसूल विभागाकडील ११६ दुय्यम कारागृहांपैकी ८० कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कारागृहांचा वापर अत्यल्प असल्याने, काही इमारती जीर्ण व मोडकळीस आल्याने तसेच त्यांच्या देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेवर होणारा वाढता खर्च लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणानुसार संबंधित भागातील कैद्यांची व्यवस्था जवळच्या जिल्हा अथवा मध्यवर्ती कारागृहात करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरगाव येथील सर्व २० कैद्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आले.


कारागृह विभागाच्या मते, या निर्णयामुळे उपलब्ध मनुष्यबळ, सुरक्षा यंत्रणा आणि इतर संसाधनांचा अधिक परिणामकारक वापर होणार असून प्रशासनाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. तसेच कारागृह विभागावरील आर्थिक भारही मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, कोपरगावच्या दुय्यम कारागृहाला टाळे लागल्यानंतर या शासकीय जागेचा भविष्यात कोणत्या कामासाठी वापर केला जाणार, याकडे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. शासन या जागेचा सार्वजनिक हितासाठी पुनर्वापर करणार की अन्य शासकीय कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button