Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
राजकीयशिर्डी

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संयम संपत चालला-न्यायासाठी संघर्ष तीव्र करण्याचे संकेत

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांमुळे असंतोष वाढत असून, न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे संकेत कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहेत. संस्थेच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षे काम करूनही रोजगाराची सुरक्षितता, सेवाशर्ती आणि इतर मूलभूत प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, न्यायालयीन प्रक्रिया, विविध स्तरांवरील मागण्या आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करूनही त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला जात नाही. प्रशासनाकडून नियम व प्रक्रियेच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुसरीकडे, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, भत्ते किंवा इतर लाभांबाबतचे निर्णय तत्परतेने राबविले जातात. त्यामुळे वर्षानुवर्षे संस्थेची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल उपस्थित होत आहे. समान काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये असा भेदभाव होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कंत्राटी कर्मचारी हे केवळ कर्मचारी नसून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार आहेत. अनेकांनी आपल्या आयुष्यातील वीस-पंचवीस वर्षे संस्थेच्या सेवेसाठी दिली आ

हेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा विचार करणे ही संस्थेची नैतिक जबाबदारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. प्रशासन, निर्णयप्रक्रियेशी संबंधित अधिकारी अथवा धोरण ठरवणारे घटक यांच्याकडून याबाबत सकारात्मक भूमिका अपेक्षित असल्याचे कर्मचारी सांगतात.
दरम्यान, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निराश न होता एकजूट कायम ठेवून लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. हा संघर्ष केवळ नोकरीसाठी नसून सन्मान, सुरक्षितता आणि कुटुंबाच्या भविष्याशी निगडित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.


जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button