Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
राजकीयशिर्डी

साईनगरीत प्रामाणिकपणाचा आदर्श सुरक्षा कर्मचाऱ्याला सापडलेली सोन्याची अंगठी साईभक्तेला परत

शिर्डी | प्रतिनिधी – साईदर्शन न्यूज
श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचारी श्री. किरण भागवत भोंगळे यांनी प्रामाणिकपणाचा आदर्श घालून देत साईनगरीत पुन्हा एकदा साईसेवेचा गौरव उंचावला आहे.
समाधी मंदिरातील नंदी गेटसमोर श्री. भोंगळे यांना अंदाजे २ ग्रॅम वजनाची, सुमारे २४ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी सापडली. अंगठी सापडताच त्यांनी कोणताही विलंब न करता ती प्रामाणिकपणे संस्थानच्या संरक्षण कार्यालयात जमा केली.
तपासाअंती साईभक्तेची ओळख पटली
ओडिशातील साईभक्त सौ. निरुपमा दास यांना अंगठी परत
संरक्षण कार्यालयामार्फत करण्यात आलेल्या तपास व योग्य पडताळणीनंतर सदर सोन्याची अंगठी ही साईभक्त सौ. निरुपमा दास (रा. ओडिशा) यांची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व नियम व प्रक्रिया पूर्ण करून सदर अंगठी संबंधित साईभक्तेला सुरक्षितपणे परत करण्यात आली.
आपली हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने साईभक्त सौ. निरुपमा दास यांनी संस्थान प्रशासन व प्रामाणिक कर्मचाऱ्याचे मनापासून आभार मानले.
साईसेवेचा खरा अर्थ
प्रामाणिक कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक
या प्रसंगामुळे श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व सेवाभावाचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. श्री. किरण भोंगळे यांच्या या स्तुत्य कृतीबद्दल संस्थान प्रशासन तसेच साईभक्तांकडून त्यांचे मनापासून अभिनंदन करण्यात आले.
साईनगरीत विश्वास जिवंत
भाविकांत समाधानाची भावना
दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. अशा ठिकाणी हरवलेली मौल्यवान वस्तू योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची ही घटना भाविकांचा विश्वास अधिक दृढ करणारी ठरली आहे. साईनगरीतील सुरक्षा व्यवस्थेचा मान उंचावणारी ही कृती सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button