Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
Blog

शिर्डीत साईभक्त आतंकवादी आहेत का संजय शिंदे आक्रमक भक्तांची सुरक्षेच्या कारणाने वाहतुक वळवली आहे _येसेकर

साई भक्त गुन्हेगार आहेत का?”
शिर्डीत पोलीस दडपशाही; भाविकांची उघड हेळसांड**
शिर्डी | प्रतिनिधी
साईंच्या नगरीतच साई भक्तांना दुय्यम वागणूक दिली जात आहे का?
शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर पोलीस प्रशासनाकडून होत असलेली अरेरावी, वाहन काढण्याची सक्ती व अडवणूक यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
“शिर्डीत साई भक्त नकोतच, अशीच पोलीस प्रशासनाची मानसिकता दिसते,” असा स्फोटक आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे यांनी केला आहे.
शिर्डी पोलीस स्टेशन समोर लक्ष्मी नगर परिसरात भाविकांची वाहने जबरदस्तीने हटवली जात असून, कोणताही ठोस पर्याय न देता भक्तांना तासन्तास फिरवले जात असल्याचा आरोप आहे.
“वाहनात येणारे साई भक्त आतंकवादी नाहीत; ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले श्रद्धाळू आहेत,” असे संतप्त शब्दांत संजय अप्पा शिंदे म्हणाले.
पोलीसांना मनमानी अधिकार कोणी दिले?
वाहतूक शाखेकडून थेट कारवाई करत भाविकांची वाहने उचलली जात असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकतर्फी निर्णय घेऊन साई भक्तांना वेठीस धरण्याचे अधिकार पोलीस प्रशासनाला कोणी दिले? असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
आर्थिक कणा मोडतोय; तरीही प्रशासन बधिर
आधीच शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना, साई भक्तांनाच अडवण्याचे धोरण राबवले जात असल्याने हॉटेल, लॉजिंग, व्यापारी, छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
अशा परिस्थितीत भाविकच येऊ दिले नाहीत तर शिर्डी कशी चालणार? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.
पालकमंत्री गप्प का?
साईंच्या नगरीत भक्तांवर अन्याय होत असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील मौन बाळगून का आहेत?
की प्रशासनाच्या या दडपशाहीला राजकीय मूकसंमती आहे? असा संशय व्यक्त होत आहे.
वाहतूक विभागाची बाजू : सुरक्षिततेचे कारण
या आरोपांबाबत वाहतूक शाखेचे प्रमुख येसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
“नगर–मनमाड रोडवरील गेट नंबर ७ येथे प्रचंड गर्दी होत आहे. साई भक्तांच्या वाहनांना किंवा जीविताला कुठलीही इजा होऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठीच वाहतूक शिर्डी बायपास रिंग रोडवर वळवण्यात आली आहे.”
सुरक्षिततेच्या नावाखाली दडपशाही नको – शिवसेनेचा इशारा
वाहतूक नियंत्रण गरजेचे असले तरी भाविकांची हेळसांड, अरेरावी व अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय अप्पा शिंदे यांनी दिला आहे.
जर तात्काळ निर्णय बदलले नाहीत, तर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button