Letest News
वटपौर्णिमेनिमित्त महिलांनी सुरक्षिततेची घ्यावी विशेष काळजी-शिर्डी पोलिसांचे आवाहन शिवसेना उद्धव गटाचे रावसाहेब खेवरे अखेर शिंदे शिवसेनेत दाखल उद्धव ठाकरेंना राजकीय धक्का शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या पार्श्वभ... आधी ओळख मग मैत्री त्यानंतर योगेशचा त्या महिले सोबत ताथा थैया -हा गुन्हा खोटा की खरा चर्चांना उधाण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर
क्राईमशिर्डी

कालिका नगर येथील एस एस फायबरच्या कारखान्याला लागली आग 

शिर्डीतील कालिकानगर परिसरातील एसएसएस डोअर फायबर या गोडाऊनला आज (19 ऑगस्ट) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील लॅमिनेशन पेपर, पेपर कटिंग मशीन आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यामुळे जवळपास 40 लाखांच्या नुकसानीची माहिती कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलानं तत्काळ दाखल होऊन आग विझवली. सध्या नुकसानीचं मूल्यांकन सुरू असून, अधिक तपासासाठी स्थानिक अधिकारी घटनास्थळी आहेत.

एसएसएस डोअर फायबर गोडाऊनला आग लागल्याचं समजताच शिर्डी साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपंचायत आणि राहाता नगरपंचायत यांच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. तातडीनं केलेल्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आणि मोठा अनर्थ टळला. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लायवूड आणि साहित्य साठवलेलं असल्यामुळे आग अधिक भडकण्याचा धोका होता,

मात्र अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कामगिरीमुळे आगीचा लोन रोखता आला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दुर्घटनेमुळे जाधव यांचं मोठं नुकसान झालं आहे हा कारखाना अगदी भरवस्तीत आहे आगीचे लोन जास्त प्रमाणात होते

त्याठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या आणि आग आटोक्यात आणली म्हणून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही आणि दरवाजे बनवण्याचे लिक्विडचे वास संपूर्ण परिसरात येते त्यामुळे तेथील रहिवासी ह्या वासाने ट्रस्ट झालेले आहेत

भर लोक वस्तीत ह्या दरवाज्यांचे कारखान्यास परवानगी दिली कोणी कि विना परवानगीनेच याठिकाणी हा कारखाना थाटला आहे याची चौकशी होऊन संबंधित मालकावर गुन्हा दाखल होऊन हा कारखाना तेथून हलवावे अशी मागणी कालिका नगर येथील रहिवासी यांनी केली आहे 

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button