Letest News
“द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद” राहता पोलिस ठाण्यात अखेर ‘ऑपरेशन उचलबांगडी’ पीआय नितीन चव्हाणांची बदली साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्ष... कॅप्टन खरात प्रकरण थंडबस्त्यात?-खरात प्रकरणात पडद्यामागे ‘मोठे हात’ सक्रिय? -तपासावर नागरिकांचा अविश... “दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू
अ.नगरक्राईम

फत्याबाद दरोडा व ऍसिड हल्ला प्रकरणाचे आरोपी अद्यापही फरार! दिवसात आरोपींना अटक न झाल्यास आमरण उपोषण

शिर्डी (प्रतिनिधी )अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदे ,गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे . जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे .मात्र त्याकडे जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या जिल्ह्यातील सुरक्षा व कायदा आणि सुव्यवस्थेकडे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी व राज्याच्या गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील महिलेवर ऍसिड हल्ला झाला मात्र आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे येथील महिला घाबरलेल्या आरोपी मोकळे असल्यामुळे येथे घबराट निर्माण झालेली आहे. आरोपी सापडत नसल्यामुळे त्यांचे व इतर आरोपींचे मनोबल वाढू शकते.

या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळेवर ठेचण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गृहमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या फत्याबाद येथे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे यांच्या घरी दरोडाचा प्रयत्न झाला.

मात्र मा. सरपंच बाबासाहेब आठरे यांच्या सून हर्षदा आठरे ह्या जाग्या झाल्या व त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे दरोडेखोर हे सोन्याचे दागिने असलेले गाठोडे खाली टाकून उड्या मारून पळून गेले. मात्र त्यांनी हर्षदा आठरे यांचा त्यामुळे काटा धरला व त्यांनी दुसऱ्याच दिवशी हर्षदा अठरा या आपल्या मुलीला दवाखान्यातून घेऊन येत असताना त्यांच्यावर ऍसिड फेकून हल्ला केला व त्यांना जखमी केले. आदल्या दिवशी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला.

हर्षदा अठरा यांच्यामुळे दरोडा असफल झाला .त्याचा राग धरून दुसऱ्या दिवशीच हर्षदा आठरे यांच्यावर ऍसिड हल्ला केला. त्यांना लोणी येथील पीएमटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र या गोष्टीला 15 दिवस उलटून गेले असले तरीही आरोपी अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे फत्याबाद मधील नागरिक विशेषता महिला घाबरलेल्या अवस्थेत आहेत. घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यामुळे गृहमंत्री व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेकडे त्वरित लक्ष देऊन आरोपींना अटक करावी.

पोलिसांनी आठ दिवसाच्या आत तपास न लावल्यास व आरोपींना अटक न केल्यास लोणी पोलीस चौकी समोरच आमरण उपोषण करण्याचा इशारा फत्याबाद गावचे माजी सरपंच बाबासाहेब आठरे यांनी दिला आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button