Letest News
वंदे भारतने मुंबई ते शिर्डी-मुख्यमंत्री फडणवीसांचा साधेपणाचा संदेश राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री फडणवीस साईचरणी नतमस्तक-भक्ती ते शक्ती : शिर्डीत डिफेन्स प्रकल्पाचे भव्य ... “शिर्डीत पेट्रोलसाठी झुंबड! पंपांवर लांबच लांब रांगा=नागरिकांना संयम ठेवण्याचे आवाहन” स्मार्ट ग्राम’चा फक्त गाजावाजा; सावळीविहीरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ!”“CCTV बंद स्ट्रीट लाईट गुल-सावळी... “क्लबवर छापे… पण ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?”“राहात्यात अवैध धंद्यांना कोणाचा राजकीय वरदहस्त?” “गर्भलिंग चाचणी रॅकेटचे धागेदोरे निफाडपर्यंत १८ आरोपी जेरबंद ६ डॉक्टर अटकेत!” “शिर्डी-राहात्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ- पिपाडा यांचा अप्रत्यक्ष निशाणा विखेंवर!” “राजकीय वरदहस्तामु... सावळी विहीरमध्ये घरफोडीचा थरार- कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ ! शिर्डीत भरदिवसा रक्तरंजित थरार- दुकानदारावर जीवघेणा हल्ला कॉकरोच जनता पार्टी”मुळे देशभरात बेरोजगारांचा संताप उफाळला-८ मिलियन तरुण एकवटले! साई संस्थानवर गंभीर...
अ.नगरक्राईम

महिलांनी कोणाकडे दाद मागायची? बहुतांशी पोलिसांकडून आरोपीचं हित जपणारा तपासच होत आहे मुंबई उच्च न्यायालय

महिलांवर होणारे अत्याचार, त्यानंतर होणारा तपास, आरोपी, दोषींवर तातडीनं कारवाईची मागणी आणि निकालाच्या प्रतीक्षेत खितपत पडलेली अशी असंख्य प्रकरणं ही उद्विग्न वस्तुस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

पोलीस यंत्रणेपासून शिंदे सरकारपर्यंत जबाबदार यंत्रणांवर न्यायालयानं ताशेरे ओढळे असून, पोलीस तपास करणारच नसतील तर आता महिलांनी दाद कोणाकडे मागायची? असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला आहे.

kamlakar

संपूर्ण व्यवस्थाच ढासळू लागली आहे असं म्हणताना समाजकंटकांना वठणीवर आणायचं असल्यास एकदा दणका द्यायलाच हवा असा संतप्त सूर आळवत न्ययायालयानं उच्च न्यायालयाचे वाभाडे काढले. पीडितांना न्याय देण्याच्या हेतूनं होणारा तपास करण्यात कोणालाच रस नसल्याची सद्यस्थिती असून,

भविष्यात काय कराल देव जाण! अशा शब्दांत उच्च न्यायालयानं प्रशासनाला धारेवर धरलं. महिला अत्याचारांसंदर्भातील काही याचिकांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही कठोर भूमिका घेतली. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठीनं यावेळी शिंदे सरकारपासून सत्तेत असणाऱ्यांसह पोलीस प्रशासनालाही निशाण्यावर घेतलं

. न्यायालयापुढं अनेक प्रकरणं येत असून, बहुतांशी पोलिसांकडून आरोपीचं हित जपणारा तपासच होत असल्याचं निशाराजनक वास्तवही न्यायालयानं समोर आणत आहा हे चित्र बदलण्यासाठी आपण योग्य आदेश देणार असल्याची बाब अधोरेखित केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button