Letest News
पार्ट–२ : १४ वर्षे लेखापरीक्षण… तरी ४१ कोटींचा गैरव्यवहार कसा अदृश्य? साईनगरीत बोगस आयुर्वेदिक औषधांचा भांडाफोड-भाविकाची ११-४०० रुपयांची फसवणूक महाशिवरात्रीच्या दिवशी शिर्डीच्या शिवावर मास विक्रीवरून तणाव वादातून हातघाई-पोलिसांची तातडीची कारवाई कोपरगावच्या आगीचा इशारा-शिर्डीत गॅस हातगाड्यांचा वाढता धोका? पहाटेच्या काकड आरतीने महाशिवरात्री उत्सवाची मंगल सुरुवात-बेलपत्र अर्पण-शंकर प्रतिमा स्थापना-मंदिर पर... फिर्यादीच चौकशीच्या रडारवर? लेखापरीक्षकांवर ठेवीदारांचे गंभीर सवाल- संचालक-सहकार खाते की ऑडिट यंत्रण... आठ लाखांहून अधिक किमतीची भक्तीची भेट-साईभक्त धनराज मुंडे यांचे भावपूर्ण दान भक्ती-सेवा आणि समाधानाचा संगम!शिर्डी येथे ‘श्री साई परिक्रमा’ उत्साहात-भाविकांसाठी मोफत थंड पेय व पा... आर्थिक ताणात बार व्यवसाय-बाऊन्सर फंड्याला वेग परिसरात नव्या पद्धतीचा ट्रेंड उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीरराज्य शासनाकडून गुणवंत पत्रकारांचा सन्मान
Blog

आळंदीला जाणाऱ्या दिंडीत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांनासाईसंस्थानने मदतीचा हात द्यावा-भारतीय लहुजी सेना

(प्रतिनिधी)- शिर्डी ते आळंदी दिंडी सोहळ्यातील
वारकरी भक्तिमय वातावरणात प्रवास करत असताना रविवारी
या पालखीला संगमनेर तालुक्यातील माऊली घाटाजवळ
अपघात झाला. या अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला
तर काही वारकरी जखमी झाले. या मयत झालेल्या वारकऱ्यांना
साईबाबा संस्थानने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भारतीय
लहुजी सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महंत काशिकानंद
महाराज, शिर्डी ग्रामस्थ व साईबाबा संस्थानने या पालखीचा
साई पालखी सोहळा असे नामकरण केलेले आहे. महंत
काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेतून अनेक वर्षांपासून धार्मिक
ठिकाणी हजारो वारकऱ्यांना बरोबर घेऊन या पालखीतील
वारकरी भाविक धार्मिक दर्शनाचा लाभ घेतात. मात्र अचानक
या पालखीचा अपघात होऊन चार वारकऱ्यांना आपला जीव
गमवावा लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून
त्या कुटुंबाला शासकीय मदत मिळेलच यात काही शंका नाही
मात्र सदर कुटुंबाला व जखमी झालेल्या कुटुंबातील वारकऱ्यांना
साईबाबा संस्थान त्रिसदस्यीय समितीने मदतीचा हात पुढे
करावा, अशी मागणी भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष
मंजाबापू साळवे यांनी साईबाबा संस्थानकडे केली आहे. या
निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव
हनिफ पठाण, राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, सुरेश अडागळे,
दगडू साळवे, संतोष भडकवाड, नंदू आरणे, सोपानराव पगारे,
भाऊसाहेब आव्हाड, राष्ट्रीय सरचिटणीस रामभाऊ पिंगळे आदी
पदाधिकाऱ्यांची नावे आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button