Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प-साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
शिर्डी

श्री साईबाबा संस्थानाचे १९२० कंत्राटी कर्मचारी होणार कायम कर्मचाऱ्यानं मध्ये आनंदाचे वातावरण

शिर्डी, प्रतिनिधि
श्री साईबाबा संस्थानमध्ये गेल्या २२ ते २३ वर्षांपासून विविध विभागात काम करत असलेले कंत्राटी कर्मचारी यांच्या संघर्षाला अखेर साईच्या दरबारात यश मिळाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

वास्तविक ५९८ कर्मचारी यांनी कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्यासाठी शासनाकडे, राजकीय नेत्यांकडून अपेक्षा ठेवली होती. तर दुसरीकडे न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सन २०२१ मध्ये याचिका दाखल केली होती त्यात त्यांनी महाराष्ट्र शासनाला प्रतिवादी केले होते.

kamlakar

९ मे रोजी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश स्वाँद्र पुगे व आर. एम. जोशी यांनी या याचिकेवर निकाल दिला आहे. संस्थानमध्ये दहा वर्षांपासून हे कर्मचारी काम करतात, त्यांना कायमस्वरुपी करण्यात यावे असा आदेश देण्यात आला. आदेशाची अंमलबजावणी १२० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली असून या निकालामुळे १९०० कामगारांचे कल्याण होणार आहे. या निकालानंतर कामगार विभागातून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु असुन हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


गेल्या २२ते २३ वर्षांपासून कायमस्वरूपीची ऑर्डर मिळावी, यासाठी अनेक कामगारांनी संघर्ष केला. अनेक आंदोलने झाली, दुर्दैवाने हे स्वप्न उराशी बाळगणारे काही कर्मचारी देवाघरी गेले. यात फक्क ५९८ कंत्राटी कामगारांना आशा होती. मात्र, त्यांनी उभारलेल्या लढ्याला यश मिळताना १९२० कर्मचान्यांचे कल्याण होणार आहे. विशेष बाब म्हणजे तीन महिन्यात यासर्व १९०० कर्मचायांना कायमस्वरूपी ऑर्डर मिळण्याची शक्यता असून २०२४ है वर्ष कंत्राटी कामगारांसाठी एक भविष्याला नवीन दिशा देणारे ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button