Letest News
शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी
अ.नगरक्राईम

भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच?

अहिल्यानगरमध्ये भेसळयुक्त कुल्फीचा भंडाफोड! १८५६ पॅकेट्स जप्त – नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच? 🔥
अहिल्यानगर : अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत भेसळयुक्त कुल्फीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून तब्बल १८५६ पॅकेट्स कुल्फी जप्त करण्यात आली आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांच्या स्वास्थ्याशी थेट खेळ सुरू असल्याचा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे.
तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेली कुल्फी ही Amul कंपनीशी संबंधित असल्याचे समोर आले असून, त्यामध्ये नियमबाह्य पद्धतीने वनस्पती तेल आणि फॅटचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार दुग्धजन्य पदार्थांमध्ये अशा घटकांचा वापर करण्यास स्पष्ट बंदी असतानाही हा प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नमुने तपासणीदरम्यान ही गंभीर बाब उघड झाली. यानंतर संबंधित कंपनीला तत्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे काही उत्पादक नियम पाळत असताना काहींकडून होत असलेल्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण उद्योगाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला असला, तरी अशा प्रकारांमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर आळा बसणार का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
👉 नागरिकांच्या ताटात भेसळ पोहोचत असेल, तर ही केवळ कारवाई नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह असल्याची भावना व्यक्त होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button