Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
Blog

खड्ड्यांचा सुकाळ – नेत्यांचा दुष्काळ! अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?” अपघातानंतरचा तमाशा – चौकशा-भेटी-फोटो आणि मिरवणूक

कोपरगाव तालुक्यात पावसाआधीच रस्त्यांची अवस्था बिकट होती. पावसाने त्यावर “बरकत” आणली.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबत नाही, पण नेते मात्र सोशल मीडियावर निधी मोजण्यात आणि स्वतःची पाठ थोपटण्यात व्यस्त आहेत.
जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा खरा नेता दुर्मिळ झाल्याने लोक त्रस्त आहेत.

sai nirman
जाहिरात

⚖️ “अनेक बळी गेले तरी जागे होत का नाही नेते?”

अपघातानंतरचा तमाशा – चौकशा, भेटी, फोटो आणि मिरवणूक

DN SPORTS

युवकांचे जीव खड्ड्यांमध्ये जात आहेत, पण रस्ते मात्र जसाचे तसंच.
सावळीविहिर, टाकळी, येवला नाका – प्रत्येक ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांनंतर नेते आणि अधिकारी फक्त फोटोसाठी सक्रिय!
जनतेचा सवाल – “बळी गेल्यावरच का जाग येते?”


🚧 निधी, घोषणा आणि भ्रष्टाचाराचं राजकारण

एडीबीच्या 189 कोटींना नकार – आता त्याच निधीचा पाठपुरावा सुरू!

उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी असूनही अंमलबजावणीचा फोल तमाशा सुरू आहे.
पुणतांबा फाटा ते वडगाव पान, कोपरगाव बेट, जुना नागपूर महामार्ग – सगळीकडे रस्त्यांचा चेंगराचेंगरीचा खेळ.
जनतेला फक्त आश्वासनं, काम शून्य!


🕉️ शिर्डीचा रस्ता विसरलेले लोकप्रतिनिधी

kamlakar

भक्तांना त्रास, पण ‘पालखी मार्ग’ वळवण्यात मात्र तत्पर!

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद झाली, पण शिर्डीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गासाठी “एक आणा” नाही.
लोकप्रतिनिधी मौनीबाबा बनले, तर नेते आपल्या संस्थानच्या प्रचारात व्यस्त!
जनतेचा संदेश स्पष्ट — “रस्ते नाहीत, मतेही नाहीत!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button