Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरक्राईम

राहात्यात अवैद्य धंद्यांचा उच्छाद-पण  पोलीस-प्रशासन-मंत्री सगळेच मौन… “इतना सन्नाटा क्यू छाया है भाई?”

राहाता | निर्भीड प्रतिनिधी – दैनिक साईदर्शन
राहाता शहरात कायद्याची माती करून अवैद्य सावकारी, गुटखा तस्करी, बिंगो वाळू तस्करी जुगाराचे साम्राज्य उभे राहिले असताना, पोलीस प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या रहस्यमय शांततेने संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून, कायदाच गुन्हेगारांच्या पायाशी लोळण घेतोय का? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दीपक पोकळे : गुन्हेगार की ‘संरक्षित सत्ता केंद्र’?
राहाता शहरात अवैद्य व्यवसायांच्या जोरावर मोठा झालेला कुख्यात गुन्हेगार दीपक पोकळे हा केवळ एक आरोपी नाही, तर तो सत्तेच्या कुबड्यांवर चालणारा गुन्हेगिरीचा ब्रँड बनला आहे कि काय?. अनेक गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्याचे अवैद्य व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू राहणे म्हणजे पोलीस व राजकीय आशीर्वादाशिवाय अशक्य बाब आहे.

सचिन गिधे हत्या : प्रशासनाच्या अंगावर काटा आणणारी अमानुषता
मानवतेला काळीमा फासणारी घटना – सचिन गिधे या तरुणास टायरवर टाकून, रॉकेल-डिझेल ओतून जिवंत जाळण्यात आले. ही घटना राहाता पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली…
प्रश्न एकच – तेव्हा पोलिसांचे हात कुठे होते?

अटक केवळ दिखावा का? अवैद्य धंदे आजही राजरोस
गुन्हेगार अटकेत असतानाही त्याचे अवैद्य व्यवसाय सुरुच असणे म्हणजे पोलीस कारवाई हा केवळ कागदी देखावा आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होतो. शहरात खुलेआम चालणारी अवैद्य सावकारी, गुटखा व जुगार वाळू तस्करी प्रशासनाला दिसत नाही की दिसूनही दुर्लक्ष केले जाते?

दैनिक साईदर्शनचा निर्भीड आरसा
दैनिक साईदर्शनने सत्याचा आरसा दाखवत या गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली उघडी पाडली. ही बाब थेट राज्याचे मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर मांडली.
मात्र त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याने, हे मौन निष्क्रियतेचे की सहभागाचे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

नागरिकांचा रोष उफाळला – ‘कारवाई नाही तर संघर्ष’
राहाता शहरातील नागरिक आता गप्प बसणार नाहीत, असा इशारा देत आहेत.
नागरिकांची ठाम मागणी आहे की –
ना. राधाकृष्ण विखे यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी थेट धडक कारवाई करावी
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी अवैद्य व्यवसाय तात्काळ बंद करावेत
अन्यथा, “कायद्याची अब्रू रस्त्यावर फेकली गेली” असा इतिहास राहात्याच्या नावावर कोरला जाईल, असा इशारा नागरिक देत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button