Letest News
शिर्डीत भक्तिरसाचा महापर्व! साई–हरी नामाचा सार्वजनिक कीर्तन सोहळा ५०व्या वर्षात — शिर्डी पंढरपूरमय मतदानाच्या दिवशी शिर्डी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय-मतदान प्रक्रियेला अडथळे टाळण्यासाठी प्रशासन... प्रचाराचा शेवटचा दिवस…आणि शिर्डीतले वातावरण अक्षरश धगधगतंय! कारण या निवडणुकीत एकच नाव वाऱ्यासारखं पस... अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर पथकाची धडक कारवाई-गावठी कट्टा विक्रीसाठी दोन इसमांचा पर्दाफा... राहाता शहरात बदलाची गर्जना-घराणेशाही-भ्रष्ट राजकारणाचा पर्दाफाश – नागरिकांचा रोष उफाळला 55 कोटींचा महाघोटाळा —तेच लोक आज राजकारणात मोठ्या खुर्च्या घेण्यासाठी धाव घेतायत.- लोकांना फसवणारे ह... प्रभाग २ क मध्ये ‘सक्षम प्रभाग – विकसित प्रभाग’चा नवा आवाज किटली चिन्हाचे उमेदवार सतीश उर्फ नंदू गों... अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा बदल : 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या — कोर्टातील अपीलचा परिणाम प्रभाग १ ब मध्ये परीवर्तनाची लाट — अॅड. प्रतिक शेळके अग्रस्थानी ‘बॅट’ चिन्हावर मतदारांचा विश्वास — श... तीन दिवस तळीरामांचे ‘दिवे लागले’ — जिल्हाधिकाऱ्यांचा कोरडा दिवस आदेश जाहीर मतदान मतमोजणी आणि मतदानाप...
अ.नगरराजकीय

मुंबईत कोरोना!दोघांचा मृत्यू!तरी अधिक काळजी घेण्याची गरज!

शिर्डी ( प्रतिनिधी) सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, मुंबईत केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला.

अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे परत कोरोना येतो की काय? अशी भीती नागरीकांना वाटत आहे.तरी यापुढे प्रशासन,आरोग्य विभाग,व नागरीकांनी अधिक खबरदारी घेतली पाहिजे.असे बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button