Letest News
साईनामाशी नातं असलेली ज्येष्ठ व्यक्ती हरपली-आशालता ताई नागरे यांच्या निधनाने शिर्डीत शोककळा रामनवमी उत्सवात ‘रिल’चा स्फोट शिर्डीची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा ‘लाचखोरीचा स्फोट!’ — शिर्डीचे प्रांत सीताराम गायकर यांचे जावई लाचखोर गोविंद शिंदे यास दिवस पोलीस कोठ... ‘रॉकेल आहे… पण स्टोव्ह नाही!’ शिर्डीत नागरिकांची अक्षरशः कोंडी लक्ष्मीनगर अतिक्रमण प्रश्न तापला- शिर्डी प्रशासनाची मोठी हालचाल-स्थळपाहणी व चौकशीचे आदेश- तहसीलदारां... शिर्डीचा भूमिपुत्र निहार गीते पुन्हा झळकणार रुपेरी पडद्यावर-‘बेवारस’मधून साकारणार महत्त्वाची भूमिका “दारू पाजून काळी आई लुटली?” कॅप्टन खरातवर कोट्यवधींच्या जमिनीचा डल्ला-शिर्डीत संतापाचा ज्वालामुखी! साईनगरीत प्रामाणिकतेचा आदर्श-सुरक्षा व आरोग्य कर्मचाऱ्यांची ईमानदारी ठरली कौतुकास्पद! शिर्डीतून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा इशारा- भोंदूबाबा खरात प्रकरणात “कठोर कारवाई अटळ!” मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम
राजकीयशिर्डी

लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून प्रभाग ६ (अ) मध्ये ताराचंद नाना शेजवळांची दमदार एन्ट्री — बदलाचा बिगुल वाजला!

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

ताराचंद नाना म्हणाले, “रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता—या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. बदलाची गरज लोकांनी अनेक वर्षे अनुभवली, आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे.”

प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटारव्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या १०० दिवसांत ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटारलाइनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल.

DN SPORTS

स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी, यावर बोलताना त्यांनी सांगितले, “ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते. जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजीविरहित प्रशासन शक्य आहे.”

तरुणांसाठी क्रीडा व कौशल्यविकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयं-सहायता गटांना पाठबळ तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल. मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेन,” असे ते म्हणाले.

शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, “मी वचन नव्हे—काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे. प्रभाग ६ (अ) चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button