Letest News
भोंदू अशोक खरातवर शिर्डी पोलिसांचा फास आवळला! कोट्यवधींच्या बनावट खात्यांसह सावकारी-जमीन घोटाळ्याचा ... दोन आरोपी गजाआड- कल्पना खरात अजूनही फरार⚖️ अटकपूर्व जामिनावर सुनावणी- पुढील तारीख 16 एप्रिल मिलिट्री सामानाच्या ट्रकला भीषण आग- पोलिसांवर गंभीर आरोप- परिसरात खळबळ दानशूर उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा “छेडछाड केल्यास थेट कारवाई!” – ‘शी-बॉक्स’ पोर्टल अधिक कडक मयत दिवटे प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांचा संकेत – फेरतपासाची शक्यता “राहता मटन मार्केटमध्ये संतापजनक प्रकार-मेलेल्या बोकडाचे मटन विक्री- दुकानदारावर कारवाईचा बडगा!” दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्याशी भेट-बजरंगबलीची मूर्ती देऊन सत्कार शिर्डी ते पनवेल … फसवणुकीचा खेळ उघड! 50 हजारांच्या झोपडपट्टीत घुसून शिर्डी पोलिसाने केला आरोपीचा ‘गे... “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा मोठा स्फोट; SIT च्या पहिल्याच पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासे!”
अ.नगरराजकीय

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी भारतीय जनसंसदेचे लक्षवेध आंदोलन ३१ डिसेंबरला अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर ठिय्या

अहिल्यानगर | प्रतिनिधी
“प्रामाणिक परिश्रम म्हणजेच प्रखर राष्ट्रनिर्मिती” या ब्रीदवाक्याअंतर्गत सहभाग प्रबोधन रचना भारतीय जनसंसद यांच्या वतीने शेतकरी संरक्षण कायदा लागू व्हावा, यासाठी येत्या ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे रात्रभर लक्षवेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात हा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
🟩 हमीभाव, कर्जमाफी आणि पिकविमा — शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या
आंदोलनामध्ये सर्व पिकांच्या हमीभावात वाढ करून हमीभावापेक्षा कमी दराने विक्री झाल्यास भावांतर योजनेतून थेट अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच बंद करण्यात आलेली जुनी प्रधानमंत्री पिक विमा योजना त्वरित सुरू करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच थकबाकीदार व नियमित कर्जदार असा भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.
🟨 दिव्यांग शेतकरी, शेततळी आणि कुंपणासाठी १००% अनुदानाची मागणी
दिव्यांग शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलद्वारे १०० टक्के अनुदानावर सर्व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
याशिवाय शेततळ्यांचे आकारमान वाढवून अनुदानात वाढ करावी, तसेच बिबटयाप्रवण गावांमध्ये १०० टक्के अनुदानावर शेतीला कुंपण देण्याची मागणी करण्यात आली आहे.
🟦 वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीस तात्काळ व वाढीव भरपाई द्या
बिबट्यांना जंगलात सुरक्षित राहू द्यावे, मात्र मानवी वस्तीतील बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंदोलकांची आहे.
तसेच वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई वाढवून ती देण्याची कार्यपद्धती सुलभ करावी, अशीही प्रमुख मागणी आंदोलनात करण्यात आली आहे.
📍 आंदोलनाची माहिती
🗓 दिनांक : ३१ डिसेंबर
⏰ वेळ : रात्रभर
📌 स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर
📞 संपर्क :
९४२२०८३२०६ / ९४२१४४००८२

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button