Letest News
नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका...
Blog

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

देशभरातील श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानाच्या अतिथीगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे स्वागत केले.
राज्य सरकारने दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, शनिशिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करत, २०१८ चा देवस्थान व्यवस्थापन कायदा लागू केला असून,

त्याअंतर्गत तात्पुरता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पदभार स्वीकाऱ्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला आणि शनी चौथर्‍यावर जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला योग्य न्याय देण्यासाठी पारदर्शक व भक्ताभिमुख प्रशासन उभारण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, “देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करणार असून, त्यात स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही देखील केली जाईल. प्रशासन भाविकाभिमुख राहील याची खात्री दिली जाईल.”यावेळी आ.लंघे पुढे म्हणाले देवस्थानचा मागील कारभार जो झाला तो सोडून पुढे स्वच्छ कारभार कसा होईल याकडे लक्ष दयावे.

यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण सत्कार स्वीकारणार नाही असे सांगत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभार अतिशय चोख पार केला जाईल असे सांगितले. मागील गैरकारभार आरोपा बाबत बोलताना ते म्हणाले येथून पुढे देवस्थानच्या कारभारात भाविकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button