Letest News
श्री साई निर्माण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून साजरी केली ' रक्षाबंधन ' भाजपाचे माजी जिल्हा पदाधिकारी बंडू शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा महिला विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल मुख्यमंत्री सहाय्यता निधी अनेक रुग्णांसाठी ठरला आशेचा किरण ! लाभार्थी रुग्णांनी व्यक्त केल्या कृतज्ञ... नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे अहिल्यानगर येथे उत्साहात स्वागत ! रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल येथे कै पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांची 125 जयंती व शे... शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने यांची बदली त्याच्या जागी अमोल भारती यांची वर्णी साईसेवेच्या कार्यात उल्लेखनीय योगदान करणाऱ्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीन... शिर्डी दुहेरी हत्याकांडातील आरोपींविरुध्द मकोका कायदयान्वये कारवाई नगर मनमाड रोडवरील हॉटेल मध्ये खंडणीसाठी गुंड्यांचा हैदोस  शिर्डीचे ग्राम महसूल अधिकारी सतीश गायके यांची गच्ची धरून धक्काबुकी करीत चोरीचा मुरुमाचा डंफ़र तस्करा...
Blog

जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा अन्यथा अमरण उपोषण—- कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य

शिर्डी ( प्रतिनिधी)जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट,पंच सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील पैठण गंगापूर नेवासा शेवगाव या तालुक्यातील पण पसारा परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याची पूर्ण तयारी झाली असून वित्तमंत्री व केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प होताना दिसत आहे त्यामुळे पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे. येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे .यासंदर्भात सर्व विभागीय कार्यालयांना निवेदन दिले असून तातडीने प्रकल्प रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय व पाटबंधारे विभाग कार्यालय दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रपती कार्यालय सर्व कार्यालयांना राज्य आणि केंद्रातील सर्व मंत्रालयांना लेखी निवेदन देऊन ‌तसे कळविले असून शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने तातडीने निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील. असे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button