जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौरऊर्जा प्रकल्प रद्द व्हावा अन्यथा अमरण उपोषण—- कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य
शिर्डी ( प्रतिनिधी)जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प होऊ नये म्हणून मच्छीमार संघटना, ट्रस्ट,पंच सामाजिक संस्था यांच्या वतीने तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले की, संभाजीनगर व अहमदनगर जिल्ह्यातील पैठण गंगापूर नेवासा शेवगाव या तालुक्यातील पण पसारा परिसरातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार करण्याची पूर्ण तयारी झाली असून वित्तमंत्री व केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प होताना दिसत आहे त्यामुळे पशु पक्षी, पर्यटन व मच्छिमार तसेच जैविक विविधतेवर मोठा परिणाम होणार असून शासनाने हा प्रकल्प तातडीने रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर निवेदन देण्यात आले आहे. येत्या सात डिसेंबर रोजी नेवासा तहसील कार्यालय व पैठण डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सामूहिक मच्छिमार समाज यांच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे .यासंदर्भात सर्व विभागीय कार्यालयांना निवेदन दिले असून तातडीने प्रकल्प रद्द न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय व पाटबंधारे विभाग कार्यालय दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालय राष्ट्रपती कार्यालय सर्व कार्यालयांना राज्य आणि केंद्रातील सर्व मंत्रालयांना लेखी निवेदन देऊन तसे कळविले असून शासनाच्या व प्रशासनाच्या वतीने तातडीने निर्णय घेण्यात यावे व सात तारखेच्या आत लेखी स्वरूपात संबंधित संस्था ट्रस्ट कमिटी पंच यांच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात यावे, असे न झाल्यास सात तारखेला दुपारी बारा वाजता सामूहिक अमरण उपोषण करणार आहेत यामध्ये अनुचित प्रकार घडल्यास याला शासन प्रशासन सरकार जबाबदार राहील. असे कहार समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.