Letest News
‘टक्केवारी कुणी मागितली?’ ते ‘ट्रम्पमुळे डांबर मिळत नाही!’ नगर–मनमाड रस्त्यावर राजकारण तापले श्रीरामपुरात जेधे–बेग टोळीवर कायद्याचा दणका!खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात बीएनएस कलम १११चा वापर बंटी लहामगे फरार- पण गुटखा तस्करी जोमात ‘त्या’ नेटवर्कला कोणाचा वरदहस्त? गुन्हा दाखल असताना आरोपी रा... श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६; काशी-अयोध्येसह पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतले साई समाधीचे मनोभावे दर्शन शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रेशनचा तांदूळ बोबडे आणि पवार काळ्या बाजारात नेतो! गोर - गरीबांच्या मुखातील  अन्न कसा हिरावून घेतो !! सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साई मंदिरात सापडली ४८ हजारांची सोन्याची अंगठी-कर्तव्य बजावताना सापडली सोन्याची अंगठी लक्ष्मण घोरपडें... राहाता तालुक्यातील एकरूखे येथे सरकारी वकिलाच्या घरी धाडसी दरोडा- १.५१ लाखांचा ऐवज लुटून चार दरोडेखोर... साईबाबांवर हात ठेवून शपथ घ्या- टक्केवारी कोणी मागितली?निलेश लंके यांचा विखेंवर घणाघात
अ.नगरक्राईम

शाळाही सुरक्षित नाहीत; राहात्यात पोलिसांचा धाक संपलाय का? जि.प. शाळेत घरफोडी-पोलिसी गस्त कुठे होती?

राहाता तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, राऊत वस्ती, केलवड बु. येथे झालेल्या घरफोडीने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शाळेसारख्या संवेदनशील व सार्वजनिक ठिकाणी अज्ञात चोरटे सहज कुलूप तोडून चोरी करतात, याचा अर्थ गाव-वस्त्यांमध्ये पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


दुपारी ४ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत शाळेचे मुख्य गेट, कार्यालय आणि पाकगृह फोडले जाते, मात्र एकाही टप्प्यावर पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळत नाही, ही बाब चिंताजनक आहे. रात्रीची गस्त नेमकी कुठे होती? गावातील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती यांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर आहे,

असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळेतील मध्यान्ह भोजनासाठी ठेवलेला धान्यसाठा चोरीला जाणे म्हणजे थेट विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास पळवण्यासारखे आहे. तरीही चोरीनंतरच गुन्हा दाखल होतो, प्रतिबंधात्मक कारवाई कुठे आहे? अज्ञात चोरट्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसल्याने तपासाची दिशा व गतीवरही प्रश्न निर्माण झाले आहेत.
वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून,


👉 रात्रीची गस्त वाढवणार का?
👉 संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त का नाही?
👉 सीसीटीव्ही, ग्रामसुरक्षा समित्या फक्त कागदावरच आहेत का?
असे थेट प्रश्न आता पोलिस प्रशासनाला विचारले जात आहेत.
जर शाळाच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा तरी कुणाकडून करायची? अज्ञात चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button