
शिर्डीः राहाता तालुक्यातील सावळीविहीर
ग्रामपंचायत समोरच असलेल्या स्वच्छता गृहाची अतिशय दयनिय अवस्था झाल्याने ग्रामपंचायत चा कारभार म्हणजे आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यात सर्वात मोठी सात हजार लोकसंख्या असलेलं हे गाव असून आंतरराष्ट्रीय शहर असलेल्या शिर्डी पासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर हे गाव नगर- मनमाड महामार्गावर वसलेले आहे. शिर्डीचे नाक म्हणून या गावाची ओळख आहे.
येथुनच देश विदेशातील साईभक्त, राजकारणी लोकांचा राबता या ठिकाणी नेहमी असतो. येथील ग्रामपंचायत ची इमारत अगदी महामार्गालगत असुन बाजार तळाच्या जागेत
वसलेली आहे.
ग्रामपंचायत चे अगदी दर्शनी भागात शौचालय व स्त्री पुरुष स्वच्छतागृह उभारले आहे. गुरुवार हा येथील आठवडे बाजार असल्याने रुई, कोहकी, शिंगवे, शिर्डी, सोनेवाडी, कोकमठाण, कारवाडी आदी पंचक्रोशीतील नागरिक येथे मोठ्या संख्येने बाजारला गर्दी करतात, या ठिकाणी माजी सरपंच रुपालीताई संतोष आगलावे यांनी ग्रामस्थांची व बाजार करूंची सोय व्हावी या उदात्त हेतूने सदर स्वच्छतागृह उभारले आहे.
परंतू याची इतकी दुरावस्था झाली आहे की, या ठिकाणाहून नाक मुठीत धरून जावे लागते. स्वच्छता गृहात डोकावले तर मुताऱ्या तुबलेल्या, शौचालय भांड्यात दारूच्या बाटल्या, विष्ठा, अगदी गच्च भरलेले. आतमध्ये तर प्रवेश करने तर सोडाच पण येथून जाताना मोठ्या मुश्कीलीने
कामे जमत नसेल तर खुर्चा खाली करा
गावाने मोठ्या विश्वासाने सरपंच पद निवडून दिलेले असते व ग्रामसेवकाने प्रत्येक ग्रामस्थांना गावचा विकास करणे व आपले गाव इतर गावापेक्षा सुंदर कसे दिसेल याचा प्रयत्न करने गरजेचे असताना महिलांच्या स्वच्छतागृहा बाबत दोघे संवेदनशील नाही. येथील स्वच्छतागृह पाहून त्यांचे घरचे असेच असतील का हे बघावे लागेल. जर तुमचे कडून कामे होत नसेल तर खुर्ची खाली करा असा सल्ला येथील गृहिणी सौ. अनुराधा वाघमारे यांनी दिला आहे.
अनुराधा वाघमारे, गृहीणी
प्रामुख्याने महिलांना मोठा त्रास होतो. येथे ग्रामसेवक, सरपंच व इतर पदाधिकारी येथून वावरत असताना त्यांचे साधे लक्ष ही याकडे जात नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल.
शासनाने महिला भगिनींची कुचंबणा थांबावी, म्हणून केलेला हा निधी खर्च ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभारामुळे वाया गेला आहे.
गाव विकसीत व्हावे तसेच इतर मतदार संघात आपल्या मतदार संघाचा आदर्श घ्यावा म्हणून ना. राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे हे प्रयत्नशील असून गावात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत असतात. सरपंच, ग्रामसेवक ग्रामस्थांची अशी कुचंबणा करत असल्याने परिणामी विधान सभेच्या निवडणूकीत मतदान कमी पडते. त्यामुळे ना विखे यांचे आदेशालाच तिलांजली देण्याचे काम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.