Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
अ.नगरराजकीय

गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य

अभिजित भट्टाचार्य सध्या एका वेगल्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधी हे भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत, अशा आशयाचं विधान केलं आहे.
अभिजित भट्टाचार्य हे यूट्यबवरील एका पॉडकस्टमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना अभिजित भट्टाचार्य यांनी महात्मा गांधी तसेच भारत आणि पाकिस्तान यावर भाष्य केलं.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

महात्मा गांधी यांच्यापेक्षाही पंचमदा (आर. डी. बर्मन) मोठे होते. पंचमदा हे संगितातील राष्ट्रपिता होते. महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भरत हा देश पहिल्यापासूनच होता. पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे चुकून महात्मा गांधी यांनी भारताचे राष्ट्रपिता असल्याचं सांगण्यात येतं, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले.

त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण जग महात्मा गांधी यांच्यापुढे झुकतं ते का? असं विचारण्यात आलं. त्यावर बोलताना आगामी 10 वर्षांनंतर तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न विचारणारही नाहीत, असं उत्तर अभिजित भट्टाचार्य यांनी केलं. अभिजित भट्टाचार्य यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अभिजित भट्टाचार्य काही दिवसांपूर्वी एका अनोख्या कारणामुळे चर्चेत आले होते. मुंबईत जगप्रसिद्ध गायक दुआ लिपा हिचा एक लाईव्ह कॉन्सर्ट झाला होता. या लाईव्ह् कॉन्सर्टदरम्यान अभिजित भट्टाचार्य यांच्या गाण्यावर दुआ लिपा चांगलीच थिरकली होती. त्यानंतर अभिजित भट्टाचार्य नव्याने चर्चेत आले होते.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button