Letest News
शिर्डीत १३ ते २१ ऑगस्टदरम्यान साईसच्चरित पारायण सोहळा! धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन
राजकीयशिर्डी

प्रभाग 5 मध्ये जागृत मतदारांचा संताप उफाळला – … फक्त आमची मीराताईच!”

साईबाबांच्या नगरीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनेक वर्षांपासून बाहेरील उमेदवारांना संधी मिळत आली.
पण त्याचा प्रभागाला काय फायदा झाला?
विकास तर झाला नाहीच… उलट प्रभागाची बदनामीदेखील रोखता आली नाही, अशी संतप्त भावना आता घराघरातून व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

प्रभागातील नागरिकांच्या मनात एकच प्रश्न धगधगत होता –
“आमच्या प्रभागाची दुर्दशा कोणी थांबवणार?”

या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी यंदा स्पष्ट निर्णय घेतला—

DN SPORTS

**“ह्या प्रभागावर लागलेला ‘कालिका नगर’ चा डाग पुसायचा असेल…

तर ते काम फक्त आमच्या मीराताईच करू शकतात!”**

याच विश्वासाने मीराताई यांना उमेदवारी करावी लागली.
ही उमेदवारी त्यांची महत्वाकांक्षा नसून,
प्रभागातील मतदारांच्या वेदनेचा आवाज आणि त्यांच्या आग्रहाचा आदर आहे.


मीराताईंचा कडक शब्दांत इशारा – “सहा महिन्यात प्रभागाचा चेहरा बदलून दाखवेन”

मीराताई म्हणाल्या :

kamlakar

“मतदारांनी मला दाखवलेला विश्वास माझ्यासाठी आदेश आहे.
मी प्रभागाचा चेहरा–मोहरा बदलून दाखवेन.
जर सहा महिन्यात काम दिसले नाही…
तर मी स्वतःहून पदाचा राजीनामा देईन.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही – ही मीराताईची हमी आहे.”

त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभागात नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
निवडून आलेल्या प्रतिनिधींनी वर्षानुवर्षे टाळलेली कामे
मीराताई हातात घेताच पूर्ण होतील, अशी खात्री मतदार व्यक्त करत आहेत.


मतदारांचा संताप आणि बदलाची हाक

प्रभागातील मतदार सरळपणे म्हणू लागले आहेत :

“खूप वर्ष सहन केलं… आता नाही!”

“ह्या वेळेस बदल अटळ आहे.”

“बाहेरचा उमेदवार नको… आमचीच मीराताई हवी!”

जागृत मतदारांचे हे स्पष्ट मत पाहता
प्रभाग 5 मध्ये भूकंपाच्या धक्क्यासारखा परिवर्तनाचा आवाज ऐकू येत आहे.


परिणाम स्पष्ट – प्रभागात ‘परिवर्तनाची लाट’

मीराताईंच्या उमेदवारीनंतर प्रभागात आशा निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांची उपेक्षा, दुर्लक्ष आणि त्रास
याला उत्तर म्हणून मतदार एकत्रित झाले आहेत.

ही निवडणूक
विकास विरुद्ध उपेक्षा
स्थानिक नेतृत्व विरुद्ध बाहेरचा उमेदवार
अशी ठरू लागली आहे…

आणि त्या लढाईत आज मतदार स्पष्ट सांगत आहेत—

“आमचं नेतृत्व – आमची मीराताई!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button