Letest News
समता पतसंस्थेच्या बोगस खात्याप्रकरणी आरोपी अशोक खरात न्यायालयीन कोठडीत भाविकांच्या कथित आर्थिक फसवणुकीच्या तक्रारीनंतर दुकान सील मात्र गुन्हा दाखल न झाल्याने संताप शिर्डी पोलिसांची दमदार कामगिरी!मंदिर परिसरातून बेपत्ता झालेली १२ वर्षीय चिमुरडी काही तासांत सुखरूप आ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी पालकमंत्र्यांच्या बैठकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ; विखे यांना कर्जतमध्येच धक्का? शिर्डीतील 'झिंग्या'वर एमपीडीएचा बुलडोझर- खून-अपहरण-मारहाण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराची थेट नाशिक कारा... लेंडीबागेत नव्हे तर आरक्षित जागेवर उभारा भव्य श्रीराम-श्रीकृष्ण मंदिर! शिर्डी ग्रामस्थांचे साई संस्थ... शिर्डीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण तक्रार दिल्याचा राग मनात धरून जीवे मारण्याची धमकी शिर्डी गुटखा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? थेट लोकायुक्त- एसीबी आणि आयुक्तांकडे धडक-एफडीए अधिकाऱ्यांच्या... शिर्डीचा विकास थांबवणारे नेमके कोण? — ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बनकर यांचा परखड सवाल
राजकीयशिर्डी

मला कोणाचे तुपाचे,दुधाचे घोटाळे बाहेर काढायचे नाहीत किंवा करायचे नाहीत मतदार संघाच्या विकासासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात – खामकर

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्राचे चर्मकार विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय हरिश्चंद्र खामकर यांनी नुकतीच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टी पक्षाकडून नुकताच खासदारकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी महेंद्र धाडवे सत्यप्रकाश अर्जुने जकीर अन्सारी विनोधन मोर्या अरुण गाडेकर वकील आनंद लहामागे वकील अविनाश शेजवळ सिमोन जगताप आदीसह विविध पदाधिकारी हजर होते

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

याप्रसंगी बोलताना संजय खामकर म्हणाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या विकासात आजी-माजी खासदारांना विकासाची कामे करण्यात अपयश आले असून त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे विकासाचा अजेंडा नाही खासदार लोखंडे हे निळवंडेचे श्रेय घेऊन पाणीदार खासदार म्हणून मी काम केले हे सांगत आहे तर मग नामदार राधाकृष्ण विखे व माजी महसूल मंत्री थोरात यांचे निळवंडे योगदान नाही का असा सवाल विचारत खासदार वाकचौरे यांचे वय झाले तरी त्यांना सत्तेचा मोह सुटत नसल्याने आपण ही उमेदवारी करत असल्याचे संजय खामकर यांनी सांगितले

kamlakar


खामकर म्हणाले की दोन्ही खासदारांची कामगिरी निराशदायक आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे दोघांनी लोकसभेत कधी शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नावर प्रश्न विचारले नाही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून ते लोकांची फसवणूक करत आहेत पाणीदार खासदार हा लोखंडेचा ढोंगीपणा आहे दोन्ही खासदार कोरोना काळात कोठे होते जेव्हा लोक अडचणीत होते त्यावेळी आपण जनतेच्या बरोबर होतो

असे सांगत आपण खासदार झालो तर शेतकरी विविध प्रश्न खते औषधे शेती अवजारांना सबसिडी बेरोजगारांना रोजगार या परिसरातील लोकांसाठी कारखानदारी असे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण खासदारकीच्या माध्यमातून काम करणार असल्याचे सांगत जनता आता परिवर्तन करणार असल्याचे यावेळी सांगितले

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button