Letest News
साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ... अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणाने राहता हादरले संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावर धडक शिर्डीत १५ लाखांचे सोने गायब- वॉटर पार्कमधील घटनेने खळबळ-पोलिसांत अद्याप तक्रार नाही 'लाडू प्रसाद कारखाने सील'च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल वाचन संस्कार हरवत चालले-मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीबाबत डांगे सरांची खंत
राजकीयशिर्डी

लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून प्रभाग ६ (अ) मध्ये ताराचंद नाना शेजवळांची दमदार एन्ट्री — बदलाचा बिगुल वाजला!

प्रभाग क्रमांक ६ (अ) मधून लोकक्रांती सेना पुरस्कृत स्वाभिमानी शिर्डी आघाडी कडून ताराचंद नाना शेजवळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी प्रभागातील वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांना प्राधान्य देत व्यापक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

sai nirman
जाहिरात

ताराचंद नाना म्हणाले, “रस्ते, पाणी, गटार, लाईट आणि स्वच्छता—या मूलभूत सुविधांची अवस्था बिकट आहे. बदलाची गरज लोकांनी अनेक वर्षे अनुभवली, आता हा बदल करून दाखवण्याची जबाबदारी मी स्विकारली आहे.”

प्रभागातील असमान पाणीपुरवठा, गटारव्यवस्थेचा ऱ्हास आणि जीर्ण रस्ते या तातडीच्या समस्यांवर ते पहिल्या १०० दिवसांत ठोस कामे करण्याच्या भूमिकेत आहेत. सर्व रस्त्यांचे डांबरीकरण, गटारलाइनचा संपूर्ण बदल व स्वच्छतेसाठी कडक यंत्रणा उभारणे हा त्यांचा पहिला कार्यक्रम असेल.

DN SPORTS

स्वाभिमानी शिर्डी आघाडीची निवड का करावी, यावर बोलताना त्यांनी सांगितले, “ही आघाडी सत्तेच्या राजकारणापेक्षा जनतेला केंद्रस्थानी ठेवते. जेष्ठ नेते बाबूजी पुरोहित यांचे मार्गदर्शन आणि युवा नेतृत्वामुळे पारदर्शी व गटबाजीविरहित प्रशासन शक्य आहे.”

तरुणांसाठी क्रीडा व कौशल्यविकास सुविधा, महिलांसाठी सुरक्षा आणि स्वयं-सहायता गटांना पाठबळ तसेच प्रभागातील स्वच्छता मोहिमेला गती देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

“मी निवडून आलो तर माझे दार नागरिकांसाठी नेहमी खुले असेल. मी ऑफिसमध्ये बसणारा नव्हे तर लोकांमध्ये फिरून तक्रारी तत्काळ सोडवणारा प्रतिनिधी असेन,” असे ते म्हणाले.

शेवटी ताराचंद नाना शेजवळ यांनी नागरिकांना आवाहन करत म्हटले, “मी वचन नव्हे—काम देण्याच्या भूमिकेत आलो आहे. प्रभाग ६ (अ) चा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे.”

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button