Letest News
शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन ठगसेन भूपेंद्र सावळेचे साथीदार फरार आरोपींना कोणाचे अभय?" – DGP समोर डॉ. राजेंद्र पिपाडांचा संतप्त स... "साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र " श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास!
अ.नगरराजकीय

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर, दि.२५- देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 यावेळी तहसीलदार (सामान्य प्रशासन) शरद घोरपडे, तहसीलदार श्री.सबनीस, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, माहिती अधिकारी अमोल महाजन, विजय जोशी, विजय वहाडणे, राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते. 

यावेळी विजय जोशी, विजय वहाडणे व राजाभाऊ मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या संघर्षयात्रींचा शासनाने सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगत  सन्मानपत्रामध्ये असलेल्या मजकुराचे त्यांनी यावेळी वाचनही केले. 

आजच्या या सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्या व्यक्तींचा जागेवर जाऊन त्यांचा सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button