Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
राजकीयशिर्डी

साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात जेवणासाठी आलेल्या साईभक्तांना अधिक चांगली सेवा मिळावी, यासाठी व्यवस्थेत काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मत कोपरगाव शिवसेना तालुकाप्रमुख भरत मोरे यांनी व्यक्त केले आहे.
मोरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रसादालयात जेवण सुरू असताना काही कर्मचाऱ्यांची शिफ्ट संपल्याने चपाती मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे काही काळ जेवणासाठी बसलेल्या भाविकांची गैरसोय झाली. शिफ्ट बदलाच्या वेळेत काही मिनिटे भोजनालय बंद ठेवण्याचा किंवा पर्यायी व्यवस्था करण्याचा विचार संस्थान प्रशासनाने करावा, अशी मागणी त्यांनी केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


तसेच प्रसादालयातील चपाती व पापडाच्या गुणवत्तेबाबतही काही भाविकांकडून तक्रारी होत असल्याचे त्यांनी सांगितले. साईभक्तांना आरोग्यदायी व दर्जेदार प्रसाद मिळावा, यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही मोरे यांनी नमूद केले.
या संपूर्ण प्रकरणी आपण कोणताही गोंधळ घातला नसून, झालेल्या प्रकाराबाबत लेखी तक्रार संस्थान प्रशासनाकडे सादर केली असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. तसेच आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीबाबत कायदेशीर मार्गाने भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणामुळे प्रसादालयातील सेवा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली असून, साईभक्तांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्थान प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button