Letest News
शिर्डी साई मंदिर सुरक्षेसाठी नवे प्रभारी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गेंचे आदेश साईपरंपरेचा वारसा जपणारे व्यक्तिमत्व – मिलिंद (दादा) कोते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भक्तीचा महासागर उसळणार! शिरडी परिक्रमा महोत्सवासाठी साईनगरी सज्ज साईसेवेचा सुंदर नमुना-संस्थानला २५ लाखांची अत्याधुनिक स्कूल बस भेट साईकृपेचा दुहेरी आनंद-ठाण्याच्या नार्वेकर कुटुंबीयांकडून ११ लाखांचे दोन सोन्याचे दिवे अर्पण शिर्डीसाठी स्वतंत्र उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय-आता ‘दारूमुक्त शिर्डी’ची खरी परीक्षा! खाकीतील कर्तव्यनिष्ठ नेतृत्वाचा गौरव शिर्डी विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती साहेबांचा वा... अनैतिक देहव्यापारावर पोलिसांचा कडक घावश्रीरामपुरातील ‘आदर्श लॉज’ एक वर्षासाठी बंद-लॉज सील शिर्डीत साईभक्तांची लूट थांबली नाही! विखे पिता–पुत्रांच्या सूचनांना एजंटांची हरताळ? साईनगरीत बालशोषणावर कडक घाव! भिक्षा आणि विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या १४ अल्पवयीन बालकांची सुटका
अ.नगरखेळ

गणपती बसवा अन् पुरस्कार मिळवा

अहमदनगर :- यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव ७ सप्टेंबरपासून सुरू होतो आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार दिला जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या ई-मेल आयडीवर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. स्पर्धेत जास्तीत जास्त गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

sai nirman
जाहिरात

निकष काय?

        सांस्कृतिक कार्यक्रम, संस्कृतीचे जतन, गडकिल्ले जतन व संवर्धन, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषणरहित वातावरण, पारंपरिक देशी खेळांच्या स्पर्धा तसेच गणेशभक्तांसाठी देत असलेल्या सुविधांची पाहणी करून गुण दिले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांनी केलेल्या कार्याबाबतचा कालावधी सन २०२३ च्या अनंत चतुर्दशी ते सन २०२४ च्या गणेश चतुर्दशीपर्यंतचा असेल.

प्रथम पुरस्कार पाच लाखांचा

DN SPORTS
        राज्यातील पहिल्या तीन क्रमांक विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून अनुक्रमे पाच लाख, अडीच लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावर २५ हजार रुपये

जिल्ह्यातून प्रत्येकी एक सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची शिफारस केली जाईल. मंडळाचे नाव, सर्व कागदपत्रे व व्हिडीओसह राज्यस्तरीय निवड समितीकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले जाईल. जिल्ह्यातील विजेत्या मंडळास २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र दिले जाईल.

३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

        गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळांना ३१ ऑगस्टपर्यंत mahotsav.plda@gmail.com या                 ई-मेल आयडीवर अर्ज करावा लागेल. मुदतीत अर्ज आलेल्या मंडळाची पाहणी केली जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित तहसील कार्यालय यांच्याशी संपर्क करावा.

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button