शिर्डी शहरात चोरीचे वाढत्या घटना चिंताजनकजिल्हा पोलिस प्रमुखानी लक्ष घालण्याची गरज अविनाश शेजवळ. यांची मागणी
शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी शहरात वाढलेल्या दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण धुमस्टाईलने होत असलेले गुन्हे पाकीट मारी विवाह समारंभात होत असलेल्या चोरी वाढते गुन्हे रोखण्यासाठी शिर्डी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी कठोर कारवाई करुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी विशेष पथकात गुन्हेगारीचा अभ्यास असलेल्या पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी वकील अविनाश शेजवळ यांनी केली आहे
वकील अविनाश शेजवळ यांनी सांगितले की माहितीच्या अधिकारात मागविलेली माहिती सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे अर्थात अकरा महिन्यात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये चोऱ्या, दरोडे, घरफोडी, इतर लूट याची रक्कम कोट्यावधी रुपये असल्याचे अधिकृत निष्पन्न झाले असले तरी शिर्डीत असणाऱ्या अवैध व्यवसायांचा विळखा, दारू अड्डे, वेशा व्यवसाय , यामुळे गुन्हेगारी वाढली असून अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिर्डीच्या आश्रयाला आले असून त्यांनी टोळ्या निर्माण करून मोठी दहशत स्थापन केली आहे.
भविष्यात शिर्डी शहर लवकर विकसित झाले नाही तर शिर्डी कडे भाविक पाठ फिरवतील याची भीती अनेकांना पडली आहे. तरी सुद्धा ज्यांची जबाबदारी आहे त्यानी जर दुर्लक्ष केले तर गुन्हेगारी कशी रोखली जाईल असा प्रश्न विचारला आहे परदेशातुन येणारे साईभक्त त्यांचे चोरी गेलेला ऐवज सी सी टिव्हीत चोरटे दुचाकी चोरताना दिसत असताना सापडत नाही शहर सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये आले आहे तर चोर कसे सापडत नाही असा सवाल विचारला असुन एल सी बी चे पोलीस शहर परिसरात फिरतात मग गुन्हेगार सापडत नसतील तर या पथकात फेरबदल करण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी लक्ष घातले पाहिजे अशी मागणी केली आहे