Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
शिर्डी

नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाला अधिकाऱ्याची प्रतीक्षा..! पंपमनकडे सर्व सूत्रे..करेल का तो शिर्डीकरांची रक्षा..?

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी नगर परिषद प्रतीवर्षी पाणीपट्टी दंड व्याज शास्ती सह वसूल करत असताना मात्र शिर्डी शहराला दररोज पिण्याचे पाणी देणे गरजेचे असताना प्रतिदिन शहराला पाणी मिळत नाही. दिवसाआड पाणीपुरवठा होत होता परंतु नगर परिषदच्या चुकीमुळे आज दोन दिवस आड पाणी मिळत असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे मोठी अडचण असल्याने महिला वर्गामधून संतप्त प्रतिक्रिया व नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपट्टी वेळेवर भरली. नाही तर व्याज दंड शास्ती वसूल करण्यापेक्षा नागरिकांना पिण्याची पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपालिकेचे काम असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
शिर्डी शहराला कनकुरी येथील साठवण‌ तलावातून पाणीपुरवठा केला जातो मात्र यावेळी नगर परिषद कडून पाणी भरण्याचे वेळापत्रक पाणी पुरवठा विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे चुकले होते. सध्या गोदावरी उजव्या कालव्याला सध्या सात दिवसापासून पाणी सुरू आहे. आणि साठवण बंदरात पाणी भरलेले असताना पूर्वी प्रमाणे एक दिवस आड पाणी देणें अपेक्षित असतानाही दोन दिवस आड पाणी सोडले जात आहे प्रशासकीय राजवट आहेत त्याठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना हाल सोसावे लागत आहे
शिर्डी शहर आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान आहे. येथील शिर्डी शहराला दररोज पिण्याचे पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम प्राधान्याने हा साठवण बंधारा भरणे गरजेचे आहे. मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष म्हणा किंवा इतर कारण म्हणा या साठवण बंदरात पाणी न आल्यामुळे शिर्डी शहराला पाणीपुरवठा दोन दिवसा्आड होत आहे.
त्यामुळे शिर्डी शहरातील अनेक उपनगरातील महिलांची पाण्यासाठी वण वण होतं आहे.तुम्ही जर पाणीपट्टी भरणार असाल तर महिलांची वनवण कशासाठी ?असा सवाल नागरिकांमधून नगरपालिकेला होत आहे. शिर्डी शहरामध्ये सुमारे ४० टक्के हे व्यावसायिक नळपट्टी धारक आहेत.
ते व्यवस्थित पाणीपट्टी भरतात.
तरीही शहरातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावे लागते. गोदावरी उजव्या कालव्याला पाणी आले. येथील साठवण बंधारे भरणे हे नगरपालिकेचे काम आहे व शिर्डी शहराला पाणीपुरवठा वेळेवर करणे हे नगरपालिकेचे काम आहे. कारण आपण पाणीपट्टी वसूल करतो. मात्र तरीही सध्या शिर्डी शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यापुढे वेळेवर पाणी द्यावे अन्यथा नगरपालिकेविरुद्ध तीव्र आंदोलनाचा छेडले जाईल. असा इशारा शिर्डी शहरातील महिलांनी दिला आहे.पालकमत्री असलेल्या ना राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मतदारसंघात. भर हिवाळ्यात हि परिस्थिती असेल तर भर उन्हाळ्यात काय असेल या चिंतेने महिला चिंताग्रस्त आहेत

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button