Letest News
चिन्नाराव हॉटेल प्रकरणाने शिर्डीत खळबळ आता शिर्डी नगर परिषद कारवाई करणार का? रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा शिर्डीत उत्साहात- महिलांनी सुजय विखे यांच्या हातावर बांधली राखी बनावट नंबरच्या बेवारस दुचाकीचा छडा- साई संस्थानच्या सुरक्षा विभागाने शोधला मूळ मालक महाराष्ट्रात तुकाराम मुंडे… तर तेलंगणात वैभव गायकवाड! अहिल्यानगरच्या भूमिपुत्राच्या धडक कारवाईने गुन... पत्रकारितेतील चार दशकांचा प्रदीर्घ प्रवास- असंख्य पत्रकारांचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख... “राधाकृष्ण विखेंना हटवा…” जरांगेंच्या निर्णायक आंदोलनापूर्वीच मुख्यमंत्र्यांना थेट पत्र! संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर
क्राईमशिर्डी

दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी!

शिर्डी हे देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि जागतिक कीर्तीचे धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. या धार्मिक नगरीत दारूबंदी कायदा लागू असतानाही शहरातील अनेक भागांमध्ये अवैध दारूची राजरोस विक्री सुरू असल्याचे आरोप नागरिकांकडून वारंवार केले जात आहेत. विशेष म्हणजे, दारूबंदी असताना सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील काही ठिकाणी अवैध दारूविक्री दिवसाढवळ्या सुरू असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे. अवैध दारूच्या अड्ड्यांवरून अनेकदा वाद, भांडणे, मारहाणीच्या घटना घडत असून महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. चोरी, घरफोडी, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालणे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, अनेकवेळा संबंधित यंत्रणांकडे तक्रारी करूनही अवैध धंद्यांवर अपेक्षित आणि कायमस्वरूपी कारवाई होत नसल्याने अवैध धंदे चालविणाऱ्यांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे “दारूबंदी कायदा केवळ कागदावरच आहे का?” असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत.


दरम्यान, परभणी जिल्ह्यात नूतन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत जुगार, मटका, अवैध दारू, गुटखा आणि रेती तस्करीविरोधात धडक कारवाईचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षकही शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यातील अवैध दारू अड्डे, मटका-जुगार व्यवसाय आणि इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करतील का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button